चेंबूर परिसरात कावळ्याचा होतोय मृत्यूl नागरिक भयभीतl

मुंबई :(जीवन तांबे) चेंबूर येथील टाटांनगर वसाहतीत कावळे व इतर पक्षी मरून पडत असल्याचे घटना घडत असल्याने   परिसरातील नागरिकांना हे पक्षी का मरतात असा प्रश्न पडला आहे. 

चेंबूर येथील वाशीनाका परिसरात विविध रासायनिक कंपन्या आहेत. या कंपनीमधून धूर , वायू बाहेर पडत असल्याने चेंबूर परिसरात प्रदूषणाचे प्रमाण जास्त आहे. याचे फार वाईट परिणाम नागरिकांच्या स्वास्थ्यावर होताना दिसत आहे. 

सध्या वाढते प्रदूषण, वातावरण बदल व  कोरोना सारख्या महामारीच्या काळात विविध विषाणूचा धोका निर्माण झाला आहे.याचा परिणाम नागरिकाप्रमाणे पक्षांवर होताना दिसत आहे. गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून चेंबूर, वाशीनाका, आरसीएफ परिसरात मोठ्या प्रमाणात कावळे व विविध पक्षी मृत्यू होण्याच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. हिवाळ्याच्या दिवसांत पशु-पक्ष्यांच्या आजारात वाढ होते. देशात कोरोनाला प्रतिबंध घालण्यासाठी उपाययोजना सुरू असताना पक्षी मरणाच्या घटना सुध्दा चेंबूर परिसरात घडत आहे. आज टाटा वसाहतीत आज एकूण 9 पेक्षा अधिक कावळे मेलेले आढळले आहे.

पक्ष्यांच्या वाढत्या मृत्यूचे कारण काय आहे अद्याप कोणालाही कळलेले नसले तरी या पक्षाचा मृत्यू  बर्डफ्लू, एच5एच1मुळे होत असल्याने नागरिक ही भयभीत झाले आहेत.

प्रतिक्रिया -

सहा. आयुक्त  ( पशु तज्ञ )राजेश चातुर

कावळे व पक्षी का मरतात त्याचे नमुने घेऊन लॅब मध्ये चाचणी करिता पाठविले आहे.  रिपोर्ट आल्यास याबाबत माहीती मिळेल.


मिलिंद तळेकर ( रहिवासी )

कावळे गेल्या नोव्हेम्बर महिन्या पासून मरताना दिसत आहेत.मला आता पर्यंत मेलेले कावळे पाच सहा आढळून आले आहे.पालिकेने खबर दारीची उपाय योजना करावी व या पक्षाचा जीव वाचविण्याचा प्रयन्त करावा.

संबंधित पोस्ट