मुलुंडला ममता दिना निमित्त गोरगरिबांना ब्लँकेट वाटप

मुलुंड:(शेखर भोसले) ममता दिना निमित्त शिवसेना मुलुंङ विधानसभेच्या वतीने विविध कार्यक्रमांचे आयोजन बुधवार दि ६ जानेवारी रोजी करण्यात आले होते. शिवसैनिक व सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांच्या सौजन्याने यानिमित्त दिवसा सकाळी ११ वाजता मुलुंड पश्चिम येथील रिचर्डसन अँड क्रुडास कोविड सेंटर येथे कोरोना रुग्णांना फळ वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तर संध्याकाळी ७ वाजता गोरगरिबांना ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

मुलुंड मधील सामाजिक क्षेत्रात नेहमीच अग्रेसर असणारे तसेच दिनदुबळे व गोरगरिबांना सढळ हस्ते मदत करण्यात नेहमीच पुढाकार घेणारे सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांनी ममता दिनाचे औचित्य साधून माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या जयंती निमित्त मुलुंड पश्चिम येथील रिचर्ड्सन अँड क्रुडास कोविड सेंटर मधील मोफत फळ वाटपचा कार्यक्रम हाती घेतला होता. यावेळी साधारण १५० कोरोना रुग्णांना फळं वाटप करण्यात आले. मुलुंडचे शिवसेना उपविभाग प्रमुख सुनिल गारे व विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्या हस्ते हे वाटप करण्यात आले.

तसेच संध्याकाळी ७ वाजता आयोजक संजय माळी यांच्यातर्फे गोरगरिबांना मोफत ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम मुलुंड पश्चिम येथील शिवसेना शाखा क्र १०४ येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख, आमदार रमेश कोरगांवकर हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. साधरण ६०० गरिबांना मोफत ब्लँकेट वाटपचा शुभारंभ विभागप्रमुख, आ. रमेश कोरगांवकर यांच्या हस्ते करण्यात आला. तद्नंतर उपविभाग प्रमुख महेंद्र वैती, सुनिल गारे, दिनेश जाधव, विधानसभा संघटक नितीन सावंत, विधानसभा कार्यालय प्रमुख सीताराम खांडेकर यांच्या हस्ते उर्वरितांना ब्लँकेट वाटप करण्यात आले. मोठ्या संख्येने गोरगरीब नागरिक या मोफत ब्लँकेटचा लाभ घेण्यासाठी उपस्थित होते. मुलुंड विधानसभेतील शिवसेनेचे महिला व पुरुष पदाधिकारी, कार्यकर्ते व इतर शिवसैनिक यावेळी उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय माळी यांच्यासोबत श्री स्वामी समर्थ सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते यांनी विशेष मेहनत घेतली. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट