वाघाच्या हल्ल्यात दोन कालवड व एक गाय ठार

गोंडपीपरी  (प्रतिनिधी) :  गोंडपीपरी तालुक्यातील धाबा वनपरिक्षेत्र अंतर्गत येत असलेल्या डोंगरगांव येथिल डोंगरीत  दिनांक २२ नोव्हेंबरला सकाळच्या सुमारास डोंगर गाव जवळच्या डोंगरीपरिसरात वाघाने हल्ला करून तीन गाय ठार केल्या. या पैकी दोन गाय आनंदराव रामचंद्र झाडे (रा.डोंगरगांव) यांच्या आहेत आणि एक गाय श्रीमती शांताबाई गोविंदा ठाकूर यांच्या आहेत.

वनपरिक्षेत्र कर्मचारी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा केला असून अधीक तपास वनकर्मचारी रायपुरे वनरक्षक करीत आहे. डोंगरगाव परीसरात वाघाची दहशत  मागील बऱयाच दिवसापासून चालू असून गेल्या सात महीण्यापासून सतत वाघाच्या हल्ल्यात अनेक गायी ठार झाल्या आहेत. त्यामुळे पशु मालकांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत आहे.तरीसुद्धा वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी वाघाच्या दहशतीमूळे गावागावात जनजागृती करायला पाहिजे पण ती जनजागृती अजून पर्यंत झाली नसल्याची गावकऱ्यांची ओरड सुरू आहे. सध्या  वनविभागा मार्फत घटना स्थळी कॅमेरे लावण्यात आले असले तरी वाघाला जेरबंद करण्यात वनविभाग अपयशी ठरत आहे.

या परिसरात शेतीचे कामे सुरू आहेत, शेतकरी, मजूर ,शेतात काम करण्यासाठी जात असतात परिसरात वाघ असल्याने  मानवावर हल्ल्या होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वन विभागाने यावर वेळीच उपाययोजना करावी व वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या  जनावरांचा पंचनामा करून मृत्यू पावलेल्या गायीच्या मालकाला योग्य ती आर्थीक मदत देण्याची मागणी केली जात आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट