आंबेडकरी चळवळीतील विचारवंत प्रा.रमाकांत यादव यांचे निधन

मुंबई: आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत, विद्या व्यासंगी, सिध्दार्थ महाविद्यालय मुंबईचे माजी उपप्राचार्य प्रा. रमाकांत रामचंद्र यादव यांचे वयाच्या ८१ व्या वर्षी  बुधवारी, १८ नोव्हेंबर रोजी  सकाळी ११ वा.निधन झाले आहे.

शैक्षणिक क्षेञाबरोबरच प्रा. रमाकांत यादव यांनी विदयार्थीदशेपासूनच आंबेडकरी चळवळीत स्वतःला झोकून दिले होते. बौध्दजन पंचायत समिती मुंबई या संघटनेचे सरचिटणीस, कार्याध्यक्ष, सभापती अशी महत्वाची जबाबदारीची पदे भूषविली आहेत. वैभववाडी तालुका बौध्दसेवा संघाचे मार्गदर्शक म्हणून काम पहात होते. १९३८ साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कणकवली येथे घेतलेल्या परिषदेचा सुर्वणमहोत्सव त्यांच्या पुढाकाराने १९८८ ला साजरा करण्यात आला.

राजकीय क्षेत्रात काम करतांना त्यांनी रिपब्लिकन पार्टी अॉफ इंडीया या पक्षाचे कोकण प्रदेश अध्यक्षपद अनेक वर्षे यशस्वीपणे संभाळले. त्यांच्या कार्याची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने त्यांना सामाजिक उत्थान पुरस्कार, जस्टीस अॉफ पीस असे पुरस्कार देऊन गौरव केला होता. तसेच अनेक संस्था संघटनानी त्यांना विविध पुरस्कार देऊन सन्मानीत केले होते.

महाराष्ट्र शासनाच्या विविध शासकीय समिती व मुंबई विदयापीठाच्या विविध समित्यांवर त्यांनी काम करुन आपल्या कार्याचा ठसा उमटवला होता. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ विचारवंत नेता हरपला आहे. त्यांच्या निधनाबदृल तीव्र दुःख व्यक्त करण्यात येत आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुली, जावई, नातवंडे असा परिवार आहे. 

आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे भाष्यकार हरपले - केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले 

रिपब्लिकन चळवळीचे ज्येष्ठ नेते,आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे  साक्षीदार  व्यक्तिमत्व, कोकणचे सुपुत्र, बौद्धजन पंचायत समितीचे माजी सभापती, रिपब्लिकन पक्षाचे उपाध्यक्ष प्रा. रमाकांत यादव यांचे  दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीच्या इतिहासाचे भाष्यकार हरपले आहेत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रियराज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत प्रा.रमाकांत यादव यांना  भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट