
पती निधनानंतर वैधव्य आलेल्या स्त्रीला विनाकारण राजकारण करणारे न्याय देणार काय?
- by Adarsh Maharashtra
- Nov 09, 2020
- 1743 views
मुंबई(प्रतिनिधी) एखाद्या महिलेला वैधव्य प्राप्त झाले, तर त्या स्त्रीची आयुष्यात काय घालमेल होते,हे एक स्त्रीच जाणू शकते.आज एका हिंदू-मराठी महिला अक्षता नाईकचे पती आणि आज्ञा नाईकचे पिता अन्वय नाईक यांनी आत्महत्या केली आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे त्यातून आत्महत्या घडणे हा एकप्रकारे सदोष मनुष्यवधा सारखाच गुन्हा आहे. अशी व्यक्ती कोणीही असो त्याच्यावर कायद्याने कारवाई झालीच पाहिजे. परंतु आज काही मंडळी भरकटलेले वर्तन करताना दिसत आहेत. माणुसकी खरोखरच संपली काय?आंदोलने करणारे मा.न्यायालयात हिंमतीने का जात नाहीत?असा प्रश्न पडतो अशी खंत बृहन्मुंबई पोलीस आयुक्तांकडून सन्मानित दीपक शिरवडकर यानी व्यक्त केली.
मनुष्यवधाच्या आरोपाखाली अटकेत असलेल्यांकरता रस्त्यावर उतरून तमाशा करून न्याय कसा मिळेल?मनुष्यवधाचा आरोप असताना सरकार आणि ज्यांच्या मृत्यू झाला त्या नाईक कुटुंबावर चिखलफेक करणाऱ्यांना भारतीय संस्कृतीचे भान राहिलेला दिसत नाही. काही राजकारणी स्वस्वार्थासाठी भोळया-भाबडया भक्तांची डोकी भडकावून कायदा-सुव्यवस्थेची समस्या निर्माण करत आहेत. भोळा-भाबडा भक्तही आपल्या पदरात काही तरी पडेल ह्या आशेने उपाशीपोटी नको त्यांच्या नादी लागून स्वतःचे जीवन उध्वस्त करताना दिसतात.राजकारणी दिवसेंदिवस गडगंज होतात अन् भक्त मात्र उपाशीच रहातात ही शोकांतिका म्हटली पाहिजे अशी खंत दीपक शिरवडकर यानी व्यक्त केली.
आज कोरोनासारखी परिस्थिती असताना देशाचे पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री, तज्ञ डॉक्टर काळजी घेण्याचे आवाहन करीत असताना त्याकडे दुर्लक्ष करीत,सरकारी पैशावर स्वतःचे उपचार आणि दौरे करणारे,सरकारी सुखसोयी मिळविणारे प्रसिद्धीलोलूप राज्यात जर उद्या कोरोनाने उचल खाल्ली तर त्याची जबाबदारी घेणार आहेत काय?याचा विचार भक्तमंडळीनी करणे गरजेचे आहे.गुन्हेगारी प्रकरणात अभिव्यक्तीचा काय संबंध?पोलीस व न्याय व्यवस्थेवर विश्वास असलाच पाहिजे.काही वर्षांपूर्वी तहलकाचे तरुण तेजपाल यांच्यावर जेव्हा कारवाई झाली होती तेव्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला झाला असे म्हणणारे कोठे होते?असा प्रश्न पडतो असे दीपक शिरवडकर यांनी सांगितले.
गुन्हेगारी प्रकरणात अटकेत असलेल्याच्या तब्येतीबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. राज्यात आज कितीतरी गुन्हेगारी प्रकरणात आरोपी अटकेत आहेत, त्यांच्या तब्येतीची काळजी घेतली जात आहेच ना!त्यांच्या कुटुंबाला भेटायला दिले जाते का?मग आताच काय आभाळ कोसळले आहे?मा.न्यायालय काय तो निर्णय देईल ना!मग दबावतंत्र कशाला?एखाद्या कुटुंबातील व्यक्तीने आत्महत्या केल्यास त्या कुटुंबावर कोणती परिस्थिती येते याचा विचार सत्तेसाठी राजकारण करीत आंदोलने करणाऱ्या राजकारण्यानी करणे ही काळाची गरज आहे. मानवता-माणुसकी पायदळी तुडवून स्वतःचेच हसे होते; यांचे भान प्रत्येकानेच ठेवले पाहिजे असे मत दीपक शिरवडकर यानी व्यक्त केले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम