
भिम आर्मीच्या वतीने राज्यभर माझे संविधान - माझे अधिकार अंतर्गत सशक्त भारत.…जातीमुक्त भारत हे अनोखे अभियान राबविण्यात येणार.
कोअर कमिटी राज्यप्रमुख मा.राजुभाई झनके यांची जाहीर घोषणा.
- by Adarsh Maharashtra
- Nov 09, 2020
- 665 views
मुंबई(प्रतिनिधी) येत्या २६ नोव्हेंबर ह्या संविधान गौरव दिनापासून ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या पूर्वसंध्यापर्यंत भिम आर्मीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात " माझे संविधान - माझे अधिकार " अंतर्गत ' सशक्त भारत.....जातीमुक्त भारत ' हे अनोखे अभियान राबविण्यात येऊन जातीयतेच्या विषामुळे विषारी झालेली , दुभंगलेली भारतीय मने सांधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येणार असल्याची जाहीर घोषणा भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे प्रमुख मा.राजुभाई झनके ह्यांनी केली आहे. ह्या अभियानाचा मुख्य उद्देश हा भारतीय जनमानसात विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय संविधानाच्या माध्यमातून सर्वसामान्य भारतीयांना किती प्रचंड मोठ्या प्रमाणात मूलभूत अधिकार बहाल केलेत ह्याची माहिती देऊन आपला अधिकार आपण कश्याप्रकारे वापरात आणून त्या अधिकारांचा सदुपयोग करून घ्यावा हाच असून ह्यातूनच उद्याचा जातीमुक्त सशक्त भारत निर्माण करण्याचा भिम आर्मीचा भीमसंकल्प असल्याचे महाराष्ट्र राज्य कोअर कमिटी प्रमुख मा.राजुभाई झनके यांनी नमूद केले आहे.
माझे संविधान माझे अधिकार अंतर्गत सशक्त भारत - जातीमुक्त भारत हे अभियान संपूर्ण महाराष्ट्रात यशस्वीपणे राबविण्यासाठी राज्य कोअर कमिटी प्रमुख मा.राजुभाई झनके यांनी महाराष्ट्रातील भिम आर्मीच्या राज्य कमिटी पदाधिकाऱ्यांपासून ते जिल्हाप्रमुखां सहीत तळागाळातील सर्वच पदाधिकाऱ्यांना स्पष्टपणे निर्देश देताना सुस्पष्ट कार्यक्रमाची आखणी करून दिली असून त्या अनुषंगाने आपापल्या विभागात पदाधिकाऱ्यांनी , कार्यकर्त्यांनी विद्यार्थ्यांची कार्यशाळा , व्याख्यानमाला पथनाट्य , लघुनाटिका , परिसंवाद , महिला शिबिरे , कार्यकर्त्यांचे बौध्दिक शिबीर ( सोशल वर्कर्स कॅडर कॅम्प ) इत्यादींच्या माध्यमातून संविधानाच्या उद्देशाबद्दल जनजागृती करावी.ह्या १० दिवसांत घरोघरी , संघटनेच्या कार्यालयात , वाचनालय-ग्रंथालयात , प्रार्थनास्थळांच्या ठिकाणी , जमेल त्या ठिकाणी संविधानाच्या प्रस्ताविकतेच्या प्रति ( उद्देशिका ) मोफत वितरित करून , त्या उद्देशिकांचे जाहीर वाचन करावे.तसेच ह्या उद्देशिकांवर भिम आर्मीचे नाव , भीम आर्मीचे बोधचिन्ह , भाई चंद्रशेखर आझाद आणि राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतनसिंह यांच्यासह काही नेत्यांचे फोटोस्थानिक जिल्हाप्रमुख व पदाधिकाऱ्यांचे नाव वगैरे टाकून त्या प्रति वाटण्यात याव्यात जेणेकरून भीम आर्मीचा ही प्रचार नि प्रसार होण्यात हातभार लागेल ,तसेच हे सर्व करीत असताना फिजिकली डिस्टनसिंग संबंधी सरकारी नियमांचे पूर्णपणे पालन करण्यात यावे असे जाहीर आवाहन राजुभाई झनके यांनी केले आहे. सतत १० दिवस हा कार्यक्रम राबविल्यानंतर ५ डिसेंबरच्या रात्री १२.०० वाजता बाबासाहेबांना वंदन करताना सशक्त भारत - जातीमुक्त भारत अभियान हा भीमसंकल्प तडीस नेण्याची प्रतिज्ञा करावी , असेही राजुभाई झनके यांनी जनतेला आवाहन केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम