मुलुंडमध्ये जावयाने केलेल्या जाळपोळीत सासरचे सहाजण भाजले.

मुलुंड: (शेखर भोसले)पत्नी घरी येत नाही म्हणून एका जावयाने सासु-सासर्याच्या घराच्या दरवाजावर पेट्रोल ओतून दरवाजा पेटवून दिल्याची घटना मुलुंडमध्ये नुकतीच घडली आहे. ऐन मध्यरात्री हा प्रकार घडल्याने दारात झोपलेला मेहुणा ३५ % भाजला असून या जाळपोळीत सासु, सासरे, दोन मेहुण्या आणि त्यांचा लहान मुलगा किरकोळ जखमी झाले आहेत. सासुरवाडीचे घर जाळणाऱ्या शंकर पोळ या जावयाला मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे. 


मुलुंड पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार इंदिरा नगर परिसरात राहणाऱ्या आरतीचा शंकर पोळ या २९ वर्षीय यूवकासोबत एका वर्षापूर्वी विवाह झाला होता. शंकर हा एका दुकानात टेलरिंग काम करत असून या दुकानातच आरती आणि शंकरचे प्रेम जुळले. लग्न झाल्यानंतर दोघेही सहा महिने धारावीत राहत होते. त्यानंतर त्यांनी नालासोपारा येथे आपले बिर्हाड हलवले. तेथेच त्याने टेलरिंग दुकान सुरू केले. शंकरला दारूचे व्यसन असल्याने दारूच्या नशेत तो आरतीला मारहाण करत असे. त्यामुळे कंटाळलेल्या आरतीने नालासोपारा सोडून आईवडिलांच्या घरी राहणे पसंद केले. 

बायको माहेरी गेल्याने आणि विनवण्या करूनही परत येत नसल्याने शंकरला तिचा राग आला होता. त्यामुळे मध्यरात्रीच्या सुमारास शंकरने मुलुंडला सासूसासर्यांच्या घरी येवून हंगामा घातला आणि घराच्या बंद दरवाजावर पेट्रोल ओतून दरवाजा पेटवून दिला. यात मेहुणा ३५ % भाजला असून सासु, सासरे, दोन मेहुण्या आणि ५ वर्षाचा भाचा किरकोळ जखमी झाले आहेत. 

याबाबत मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल होताच पोलिसांनी आरोपी शंकर यास अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

मुलुंड पोलिस ठाण्याचे व.पो.नि.रवि सरदेसाई यांनी याबाबत अधिक माहिती देताना सांगितले की, आरोपीची पत्नी आरतीने नालासोपारा येथील पोलिस ठाण्यात पती शंकरच्या विरोधात तक्रार दाखल केली होती. पतिकडून वारंवार मारहाण व मानसिक त्रास होवू लागल्याने कंटाळून ती आई-वडिलांकडे आली होती. आरोपीने दरवाजा जाळल्याने व त्यात त्याचे इतर नातेवाईक भाजल्याने त्याला अटक केली असून न्यायालयाने त्याला पोलिस कोठडी सुनावली आहे. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट