
नफरतखोरांच्या नीच वांझोट्या संस्कृतीला आंबेडकरी विचारानेच आम्ही कायमचे ह्या मातीत गाडू.
भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांचा ऐतिहासिक विचार परिषदेत निर्धार.
- by Adarsh Maharashtra
- Nov 08, 2020
- 1575 views
मुंबई (प्रतिनिधी) गेल्या काही वर्षांपासून तथागत बुद्ध आणि चक्रवर्ती सम्राट महान अशोक यांच्या पवित्र भारतीय भूमीत भारतीय समाजात जातीयवादी-विषमतावादी शक्तींकडून सातत्याने नफरतीचे विष कालवल्या जात आहे.जागोजागी दलित-आदिवासी-शोषित-पीडित-वंचित ह्या सर्वहारा समूहाला लक्ष्य करून ठेचल्या जात आहे.त्यांच्यावर सातत्याने शारीरिक नि मानसिक हल्ले करण्यात येत आहे.सध्या तर विकृत निचपणाने तर हद्दच पार केली असून , इथल्या लेकीबाळींचे हातपाय तोडून पाशवीपणे बलात्कार करून त्यांच्यातील रानटी संस्कृतीचे हिणकस प्रदर्शन घडविण्यात येत आहे , तरण्याबांड पोरांना कापल्या जात आहे.ह्या गोरगरिबांच्या रक्ताने नुसती रक्तपंचमी खेळण्यात येत आहे. हे रक्ताचे घोट घेऊन सुद्धा ह्या नराधमांची तहान भागत नसून ते विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यांची नासधूस करीत असून , आम्ही ह्या नफरतखोरांची वांझोटी नीच संस्कृती ह्याच मातीत गाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही ,असा प्रचंड घणाघात भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे यांनी शनिवारी ७ नोव्हेंबर ह्या ऐतिहासिक विद्यार्थी दिनी बीड जिल्ह्यातील बरदापुर ह्या गावात पार पडलेल्या ऐतिहासिक विचार परिषदेचे उदघाटन करताना केल्याची माहिती भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
गेल्या चार दिवसांपासून संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतलेली बहुप्रतिक्षित ऐतिहासिक विचार परिषद हजारोंच्या उपस्थितीत पार पडली.ह्या परिषदेचे खास वैशिष्ट्य म्हणजे ही परिषद विटंबना झालेल्या पुतळ्यासमोर होणार होती,परंतु त्यामुळे कायदा सुव्यवस्था धोक्यात येऊ नये आणि आचारसंहितेचा भंग होऊ नये ह्यासाठी ही परिषद एका प्रशस्त हॉल मध्ये घेण्यात आली. ह्यासाठी स्थानिक पोलीस प्रशासनाने सहकार्याची भूमिका पार पाडली असेही भिमपँथर मा.राजेश गवळी ह्यांनी कळविले आहे.
ह्या विचार परिषदेला भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्याचे महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड,राज्याचे उपाध्यक्ष मा.बलराजभाई दाभाडे , राज्य संघटक मा.अक्षयजी धावारे , राज्य संघटक मा.रणजितजी माने , बीड जिल्ह्याचे डीवायएसपी साहेब {DYSP} , त्या गावातील सरपंच , लातूर जिल्हा प्रमुख मा.विलासअण्णा चक्रे ,औरंगाबाद जिल्हा प्रमुख आणि मराठवाडा प्रमुख मा.बाळूभाऊ वाघमारे , परभणी जिल्हाप्रमुख भीमपुत्र मा.कचरूभाई गोडबोले ,जालना जिल्हाप्रमुख मा.सुभाषजी दांडेकर , हिंगोली जिल्हाप्रमुख व मराठवाडा विभाग सचिव मा.आनंदराव खरे , नांदेड जिल्हाप्रमुख मा.अशोकभाऊ वायव्हल , उस्मानाबाद जिल्हाप्रमुख मा.अविनाशजी गायकवाड , बीड अंबाजोगाई विभाग प्रमुख मा.सिद्धार्थजी मायंदळे, बीड विभाग प्रमुख मा.गोपीनाथराव गायकवाड ,मराठवाडा संघटक मा.विनोदभाई कोल्हे यांच्यासह बीड युवा अध्यक्ष मा.बाबा मायंदळे तसेच सर्व तालुकाप्रमुख , मराठवाडयातील असंख्य पदाधिकारी , महिला वर्ग आणि विशेष म्हणजे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी वर्ग ह्या विचार परिषदेला उपस्थित होता,अशी माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
ह्या विचार परिषदेला संबोधित करताना सर्वच वक्त्यांनी ह्या देशातील जातीय मानसिकतेवर सडकून टीकास्त्र सोडताना , आज ह्या देशाला खऱ्या अर्थाने तथागत बुद्धांचे विचार , महान अशोकाचे धम्मशासन आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचे भारतीय संविधान ह्याच तीन सूत्रांची आवश्यकता असल्याचे ठाम प्रतिपादन करताना , अशोकभाऊ कांबळे , राज्याचे महासचिव मा.सुनीलभाऊ गायकवाड आणि राज्य उपाध्यक्ष मा.बलराजभाई दाभाडे यांनी भिम आर्मीच्या वतीने संपूर्ण राज्यभर येत्या २६ नोव्हेंबर पासून म्हणजेच संविधान गौरव दिनापासून ते ५ डिसेंबर पर्यंत १० दिवस " आपले संविधान......आपले अधिकार " हे अभिनव अभियान राबविण्यात येणार असल्याचे जाहीर केले , अशीही माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी दिली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम