कारशेड वाद : मुख्यमंत्री बदलल्यावर जागेची मालकी बदलते का? - महापौर किशोरी पेडणेकर

मुंबई :मेट्रोच्या कारशेडवरून राजकारण चांगलेच तापू लागले आहे. आघाडी सरकार सत्तेवर येण्याआधी उद्धव ठाकरे यांनी गोरेगाव आरे येथील कारशेड कांजूरमार्गला हलवू असे आश्वासन दिले होते. त्यानुसार कारशेड कांजूरला हलवल्यावर सॉईल टेस्टिंगचे काम सुरू झाले असताना केंद्र सरकारने त्या जागेवर दावा केला आहे. केंद्र सरकारने राज्य सरकारला कारशेडचे काम बंद करण्याची नोटीस बजावली आहे. यावरून मुख्यमंत्री बदलल्यावर जागेची मालकी बदलते का, असा थेट सवाल मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी उपस्थित केला आहे. तसेच मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सक्षम असलेले पंतप्रधान चांगला निर्णय घेतील, असा टोला महापौरांनी लगावला आहे . 

मेट्रोच्या कांजूरमार्ग येथील कारशेडचे काम बंद करण्याची नोटीस दिली आहे. याबाबत बोलताना महापौरांनी मुख्यमंत्री बदलल्यावर जागेची मालकी बदलते का, असा थेट सवाल उपस्थित केला आहे. याबाबत बोलताना केंद्र सरकारने आरे कारशेडच्या कामाला स्थगिती दिली असेल तर, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी कोर्टात ही जमीन राज्य सरकारची असल्याचे प्रतिज्ञापत्र सादर केले होते. फडणवीस यांनी दाखल केलेले प्रतिज्ञापत्र आजही कोर्टात असेल. जर तत्कालीन मुख्यमंत्री ही जागा राज्य सरकारची आहे असे म्हणत असतील तर मुख्यमंत्री बदलल्यावर या जागेची मालकी बदलली का. असा प्रश्न महापौरांनी उपस्थित केला आहे. केंद्र सरकारला कोणी काहीही फीड करत आहेत. या ठिकाणी कारशेड बांधले तर कल्याण डोंबिवली पर्यंतच्या नागरिकांना त्याचा फायदा होईल. कांजूरच्या जागेबाबत भाजपच्या मुख्यमंत्र्यांनीच प्रतिज्ञापत्र दिले असल्याने या जागेचा केंद्र सरकार नक्की विचार करेल. मुंबई आणि महाराष्ट्राच्या हितासाठी सक्षम असलेले पंतप्रधान चांगला निर्णय घेतील असा टोला महापौरांनी लगावला आहे.

33.5 किमीच्या मेट्रो 3 मार्गासाठी आरे जंगलातील 33 एकर जागेवर कारशेड बांधण्याचा निर्णय मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन (एमएमआरसी) ने घेतला. त्यानुसार ही जागा मिळवली, त्यावर काम देखील सुरू केले. अगदी काही दिवसांपूर्वी या जागेवर कारशेडचे काम सुरू होते. मात्र यावरुन 2014 मध्ये संघर्षाला सुरुवात झाली. पर्यावरण प्रेमी आणि आदिवासीयांनी याला विरोध करत रस्त्यावरची आणि न्यायालयीन लढाई सुरू केली. ही लढाई सात वर्षे सुरू होती. अखेर त्यांच्या या लढ्याला महाविकास आघाडी सरकारच्या काळात यश आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरे कारशेड कांजूरला हलवण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट