राज्यात आज ५ हजार ३६९ नवे कोरोनाचे रुग्ण;तर ३ हजारांहून अधिक कोरोनामुक्ततर ११३ जणांचा मृत्यू

मुंबई : राज्यात आज दिवसभरात ५ हजार ३६९ नवे कोरोनाबाधित आढळले. तर, ३ हजार ७२६ जण कोरोनामुक्त झाले आहेत.याशिवाय ११३ रुग्णांचा मृत्यू झाला असल्याची माहिती आरोग्य विभागाकडून मिळाली आहे.

याचबरोबर राज्यातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १६ लाख ८३ हजार ७७५ वर पोहचली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट ८९.९२ टक्क्यांवर पोहचला आहे.मागील काही दिवसात राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येपेक्षा कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या सातत्याने अधिक आढळून आली होती. त्यानंतर आज पुन्हा एकदा कोरोनाबाधितांची संख्या ही कोरोनावर मात करणाऱ्यांच्या संख्येपेक्षा अधिक आढळली आहे. राज्यातील कोरोनाचा संसर्ग हळूहळू कमी होत असला तरी देखील कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंच्या संख्येत रोज भर पडतच आहे.नागरिकांनी मास्कच्या वापरासह कोरोना संसर्ग रोखण्यासाठी अन्य नियमांचे पालन करणे आवश्यक आहे.

राज्यातील एकूण १६ लाख ८३ हजार ७७५ कोरोनाबाधितांच्या संख्येत १ लाख २५ हजार १०९ अॅक्टिव्ह केसेस, डिस्चार्ज मिळालेले १५ लाख १४ हजार ७९ जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४४ हजार २४ जणांच्या संख्येचा समावेश आहे.

सध्या राज्यातील मृत्यू दर २.६१ टक्के एवढा आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ९० लाख २४ हजार ८७१ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १६ लाख ८३ हजार ७७५ (१८.६६ टक्के) नमूने पॉझिटिव्ह आढळले आहेत.सध्या राज्यात २५ लाख ४४ हजार ७९९ जण गृह विलगीकरणात आहेत. तर, १२ हजार २३० जणं संस्थात्मक विलगीकरणात आहेत.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट