
विश्वास २०२०-२१ गळीत हंगामाचा शुभारंभ
- by Adarsh Maharashtra
- Nov 01, 2020
- 1118 views
शिराळा:(आनंद बेगंडे)आज ता. १ नोव्हेंबर चिखली (ता. शिराळा) येथील 'विश्वास' कारखाण्याचा २०२०-२१ गळीत हंगामाचा शुभारंभ राज्याचे जलसंपदा मंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा. ना. जयंतराव पाटीलसाहेब यांच्या शुभहस्ते व पन्हाळा - शाहुवाडीचे माजी आमदार सत्यजीत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत गव्हाणीत ऊसाची मोळी टाकून संपन्न झाला. कारखाण्याचे अध्यक्ष, आमदार मानसिंगराव नाईक व उपाध्यक्ष, माजी आमदार बाबासाहेब पाटील, संचालक मंडळ, विश्वास व विराज उद्योग समुहातील सर्व संस्थेच संचालक, युवा नेते विराज नाईक यांच्यासह राजारामबापू कारखाण्याचे उपाध्यक्ष विजयबापू पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तहसीलदार गणेश शिंदे, गट विकास अधिकारी डॉ. अनिल बागल, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने, माजी कार्यकारी संचालक बाबासाहेब पवार, लोकनेते फत्तेसिंगराव नाईक दूध संघाचे अध्यक्ष अमरसिंग नाईक, सूतगिरणीचे अध्यक्ष सुरेश चव्हाण, प्रचिती संस्थेचे अध्यक्ष राजेंद्रसिंह नाईक, तालुक्याचे माजी सभापती, प. स. सदस्य सम्राटसिंग नाईक, प्रमोद नाईक, विवेक नाईक, पृथ्वीसिंग नाईक, 'विराज'चे उपाध्यक्ष अशोकदाजी पाटील, नगराध्यक्ष अर्चना शेटे, माजी नगराध्यक्ष सुनंदा सोनटक्के, महिला राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रुपाली भोसले, बाजार समितीच्या उपसभापती नंदाताई पाटील, युवक राष्ट्रवादी अध्यक्ष राहुल पवार, कार्यकारी संचालक राम पाटील उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम