पहिल्या वर्षाच्या काळात खासदार मनोज कोटक यांनी संसदेत केली उत्कृष्ट कामगिरी.

होत आहे देशातील सर्वोत्कृष्ट खासदारांत गणना.

मुलुंड:(शेखर भोसले) ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांनी आपल्या पहिल्या वर्षाच्या खासदारकीच्या काळात संसदेत १०० टक्के उपस्थिती लावल्याचे समोर आले असून गेल्या वर्षभराच्या काळात झालेल्या संसदेच्या तीन अधिवेशनात आपल्या मतदार संघाशी संबधित तसेच मुंबईशी संबंधित काही महत्वपूर्ण विषय संसदेत मांडून संपूर्ण देशाचे लक्ष या प्रश्नांकडे वळविण्यात, त्यादृष्टीने कायदा बनविण्यात व दुरुस्ती करण्यात ते यशस्वी ठरले असून यामुळे देशातील काही मोजक्या सर्वोत्कृष्ट खासदारांमध्ये त्यांची गणना करण्यात येत आहे.

खासदार मनोज कोटक यांनी गेल्या वर्षभरात संसदेत १०० टक्के उपस्थिती लावली असून जून २०१९ पासूनच्या मागील ३ अधिवेशनात काही मोजक्या खासदारांनाच संसदेत १०० टक्के उपस्थिती लावणे शक्य झाले आहे तसेच एकूण ८० दिवस चाललेल्या या तीन संसदिय अधिवेशनात ८३ प्रश्न विचारून मनोज कोटक यांनी संसदेत आपले अस्तित्व प्रकर्षाने जाणवून दिले आहे. मुंबईतील उपनगरीय रेलवे सेवेसंबधित प्रश्न, नव्याने बांधण्यात येत असलेल्या इमारतींना लावण्यात येत असलेल्या काचेच्या तावदानामुळे आगीच्या वेळी मोठ्या प्रमाणात होणाऱ्या नुकसानीचा प्रश्न, आपल्या ईशान्य मुंबई मतदारसंघात असलेल्या डम्पिंग ग्राउंडचा प्रश्न, नवीन सीएनजी गैस स्टेशन वाढविण्यासंबधितचा प्रश्न, एमटीएनएल आणि बीएसएनएलचे पुनरुज्जीवन, शहरातील कामगार विमा योजना रूग्णालयाचे आधुनिकीकरण इत्यादी प्रश्न तसेच इतर अनेक प्रश्न त्यांनी संसदेत मांडून संसदेत आपला आवाज उठवला आहे. 

मनोज कोटक यांच्या कार्यकुशलतेमुळे आणि संसदेतील १०० टक्के उपस्थितीमुळे त्यांच्या मतदार संघातील नागरिक देखील खुश असून खासदारकीच्या पहिल्या वर्षातच त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट