
भिम आर्मी प्रमुख चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर झाला भ्याड गोळीबार.
भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे आणि भिमपँथर मा. राजेश गवळी यांनी केली झेड + सुरक्षेची मागणी.
- by Adarsh Maharashtra
- Oct 26, 2020
- 707 views
मुंबई (प्रतिनिधी) उत्तर प्रदेशमधील बुलंदशहरच्या पोटनिवडणुकीत आजाद समाज पक्षाच्या उमेदवाराला वाढत्या प्रतिसादाचा धक्का तेथील सर्वच राजकीय पक्षांना बसला असून २५ ऑक्टोबर रोजी बुलदंशहराच्या नुमाईश मैदानात भिम आर्मीचे सुप्रीमो आणि आजाद समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांची विशाल अशी भव्य विराट सभा पाट पडली.ह्या सभेचीच चर्चा संपूर्ण उत्तर प्रदेश मध्ये सुरू असताना त्याच दिवशी रात्री ८.०० च्या सुमारास भाई चंद्रशेखर आझाद यांच्या ताफ्यावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला.सुदैवाने ह्यात भाई चंद्रशेखर यांचेसह सर्वजण सुरक्षित आहेत.मात्र ह्या भ्याड हल्ल्याचे पडसाद संपूर्ण भारतात उमटून संतप्त प्रतिक्रिया येऊ लागल्या.महाराष्ट्रात सुद्धा मोठ्या प्रमाणात निषेध नोंदविण्यात आला असून भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे आणि राज्याचे प्रचार-प्रसिद्धी प्रमुख मा.भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे ह्या घटनेचा जाहीर निषेध केला असून राज्य कोअर कमिटीचे प्रमुख मा.राजूभाई झनके यांच्या आदेशानुसार संपूर्ण महाराष्ट्रात सर्व जिल्ह्यांत स्थानिक जिल्हाप्रमुख-तालुकाप्रमुख आणि इतर पदाधिकार्यांच्या उपस्थितीत जिल्हाधिकारी महोदयांना निवेदने देऊन भाईंवर झालेल्या हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली.
मा.अशोकभाऊ कांबळे आणि भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आपल्या पत्रकात म्हंटले आहे की भाई चंद्रशेखर आझाद यांना केंद्र सरकारने झेड + सुरक्षा तात्काळ द्यावी तसेच हा झालेला भ्याड हल्ला पहाता भिम आर्मीचे राष्ट्रीय अध्यक्ष भाई विनय रतन सिंह राष्ट्रीय मुख्य महासचिव भाई कमलजी वालिया आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष मा.मनजितसिंह नौटीयाल जी यांच्या जीविताला सुद्धा गंभीर धोका निर्माण झाला असून ह्या पार्श्वभूमीवर त्यांना सुद्धा पुरेशी सुरक्षा पुरविण्यात यावी अशी मागणी केली आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम