
जागर आदिशक्तीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा या उपक्रमाअंतर्गत स्त्री शक्तीचा सन्मान
- by Adarsh Maharashtra
- Oct 26, 2020
- 1974 views
मुलुंड :(शेखर भोसले) भांडुप येथील शिवसेनेच्या महिला उपविभाग संघटिका नेहा पाटकर यांनी "जागर आदिशक्तीचा, सन्मान स्त्रीशक्तीचा" हा उपक्रम नवरात्रौत्सव काळात हाती घेतला होता. या उपक्रमा अतर्गत नवरात्रीच्या दिवसांत विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या आणि आपले स्वतःचे अस्तित्व निर्माण केलेल्या महिलांचा सत्कार त्यांच्यातर्फे करण्यात आला.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी शनिवार दि १७ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्र शासनाचा शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या, आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू मेघाली कोरगावकर-म्हसकर या प्रसिद्ध खेळाडूचा सत्कार करण्यात आला. रविवार दि १८ ऑक्टोबर, नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी २०१९ साली झालेल्या 'मिस मुबंई' आणि २०२० साली झालेल्या 'मिस इंडिया' या शरीरसौष्ठव स्पर्धेतील सुवर्ण पदक विजेती, प्रसिद्ध शरीरसौष्ठवपटू हर्षदा पवार हिचा गौरव करण्यात आला. सोमवार दि. १९ ऑक्टोबर रोजी नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी जरा हटके अश्या स्त्रीशक्तीचा सन्मान नेहा पाटकर यांच्यातर्फे करण्यात आला. मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील स्मशानभूमीतील स्मशान शांततेत दिवसा तसेच रात्रीच्या ड्युटीला देखील जराही न भिता आपलें कर्तव्य पूर्ण जबाबदारीने बजावणाऱ्या मुंबई महानगर पालिकेच्या महिला कर्मचारी, स्मशानभूमीच्या प्र. व्यवस्थापक वंदना सुनिल अवसरमल यांचा सन्मान त्यांच्या कार्यक्षेत्री म्हणजेच टाटा कॉलनीतील स्मशानभूमीत करण्यात आला. नवरात्रीच्या चवथ्या दिवशी २० ऑक्टोबर रोजी लता अरुण जाधव या महिला सफाई कर्मचारीचा सन्मान करण्यात आला. दि २१ ऑक्टोबर रोजी मुंबई उच्च न्यायालयातील वकील सुनिता गांवकर यांचा सन्मान करण्यात आला. दि २२ ऑक्टोबर रोजी अंगणवाडी सेविका मनिषा देठे यांचा सन्मान करण्यात आला. नवरात्रीच्या सातव्या दिवशी दि २३ ऑक्टोबर रोजी स्वतः अपार कष्ट करून आपल्या मुलांना उच्च शिक्षित करून त्यांना समाजात सन्मान मिळवून देणाऱ्या वैशाली वेदपाठक या एका माऊलीचा सत्कार नेहा पाटकर यांच्यातर्फे करण्यात आला. दि २४ ऑक्टोबर रोजी डॉक्टर सुषमा कदम यांचा नवरात्रीच्या आठव्या दिवशी सत्कार करण्यात आला.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम