
मास्क न लावणाऱ्यांविरोधात मुलुंडमध्ये पालिकेच्या पथकातर्फे रोज होत आहे कारवाई
- by Adarsh Maharashtra
- Oct 22, 2020
- 1449 views
मुलुंड :(शेखर भोसले) कोरोना संसर्गाला आळा घालण्यासाठी मुंबई महानगर पालिकेने मास्क वापरण्याची सक्ती केली असली तरी अनेक वेळा नागरिकांकडून सार्वजनिक ठिकाणी फिरताना मास्क वापरला जात नसल्याने पालिकेच्या टी वॉर्डच्या एका विशेष पथकाकडून मास्क न वापरणाऱ्यांविरोधात तसेच चुकीच्या पद्धतीने मास्क वापरणाऱ्यां विरोधात कारवाई केली जात आहे. त्याच अनुषंगाने मुलुंड पूर्व स्टेशन परिसरात पालिकेच्या टी वार्डाचे अधिकारी भरत बाड यांच्या नेतृत्वाखाली महेंद्र पाटील, अनिल चव्हाण, दादा घाडगे, अरविंद चव्हाण व इतर पालिका कर्मचारी विना मास्क फिरणाऱयांवर तसेच चुकीच्या पद्धतीने मास्क वापरणाऱ्या बेशिस्त नागरिकांवर नजर ठेवून त्यांच्यावर कारवाई करून दंड वसूल करत आहेत. तसेच मायक्रोफोनद्वारे लोकांना मास्क लावण्याचे महत्व व मास्क कश्या पद्धतीने लावावा याबद्दल दिवसभर मार्गदर्शन केले जात आहे.
सार्वजनिक परिसरात फिरताना मास्क लावणे बंधनकारक असूनही काही नागरिक पालिकेच्या नियमांचे पालन करत नसल्यामुळे रोज साधारण १०० जणांवर दंडात्मक कारवाई केली जात असून अश्या बेशिस्त नागरिकांकडून २०० रुपये दंड वसूल केला जात असून त्यांना रितसर पालिकेची पावती दिली जात आहे. काही अतिशहाणे पालिकेचे नियम न पाळता हुज्जत घालत बसतात त्यांच्यावर पोलिसांना सांगून कारवाई करण्यास सांगितले जाते. बहुतेक नागरिकांना आम्ही व्यवस्थित मार्गदर्शन करून मास्कचे महत्व आणि मास्क कश्या प्रकारे वापरावा हे समजावून सांगतो. मुलुंड नवघर पोलिसांच्या टीमचे अतिशय उत्तम प्रकारे सहकार्य याकामी पालिकेच्या पथकाला मिळत आहे, असे पालिका अधिकारी भरत बाड यांनी सांगितले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम