
महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत देऊन त्यांची विमा रक्कम त्यांना वर्ग करा : भिम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांची जाहीर मागणी.
- by Adarsh Maharashtra
- Oct 20, 2020
- 1476 views
मुंबई(प्रतिनिधी)महाराष्ट्रात सध्या परतीच्या अवकाळी पावसाने प्रचंड हैदोस घातला असून ,उडीद ,मूग ,तूर ,कापूस ,केळी ,डाळिंब मोसंबी ह्यासारख्या फळ भाजीपाल्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून जनावरे सुद्धा वाहून गेली असून मनुष्यजी वितहानी सुद्धा झाली आहे.अनेक ठिकाणी घरांची पडझड होऊन मोठ्या कष्टाने उभा केलेला संसार डोळ्यांदेखत वाहून गेला आहे. शेतकरी प्रचंड अस्वस्थ असून तो सरकारच्या भरघोस मदतीच्या प्रतीक्षेत असून सरकारने ह्या उध्वस्त झालेल्या शेतकरी राजाला पुन्हा सक्षमपणे उभे करण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात सरसकट " ओला दुष्काळ " जाहीर करून नुकसानग्रस्त बळीराजाला पंचनामे करीत बसण्यापेक्षा आताच्या परिस्थितीत जगता येण्याएव्हढी तात्काळ मदत द्यावी , नंतर हवे ते पंचनामे करून त्या बळीराजाला योग्य ती नुकसानभरपाई द्यावी अशी आमची भिम आर्मीच्या वतीने भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या एका पत्रकाद्वारे जाहीर मागणी केली आहे.ही नुकसानभरपाई देतेवेळी कोणत्याही प्रकारचे शासकीय नियम आडवे न येऊ देता बळीराजाला जगण्यासाठी तात्काळ आधार द्यावा.प्रथम मानवतावादी भूमिका घेऊन मानवधर्म पाळावा नंतरच नियम वगैरे बघता येतील , पण आता कोणत्याही परिस्थितीत आमचा बळीराजा जगावा ,ह्याच बाबीला सर्वोच्च प्राधान्य द्यावे हीच आमच्या भिम आर्मीची ठाम भूमिका असल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले असून सत्ताधारी असो वा विरोधक ह्यांनी कोणीही सध्याच्या स्थितीत कोणत्याही प्रकारचे गलिच्छ राजकारण न करता शेतकऱ्यांना आणि इतर नुकसानग्रस्तांना ज्यास्तीत ज्यास्त नुकसानभरपाई देऊन मदत कशी करता येईल , त्याचा उध्वस्त झालेला संसार पुन्हा कसा उभा करता येईल ह्यासाठी प्रयत्न करावेत , त्यांच्या ह्या प्रयत्नांना भिम आर्मी सर्वोपरी सहकार्य करेल , असेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी आपल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम