आमचा बळीराजा दुष्काळाने होरपळत असताना आमचे विरोधी पक्षनेते बिहारमध्ये मेजवाण्या झोडत बसलेत काय ?

भिम आर्मीचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांचा जळजळीत सवाल.

मुंबई (प्रतिनिधी) गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात परतीच्या पावसाने अक्षरशः थैमान घातले असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास शब्दशः हिरावून घेतला गेला आहे.अनेकांचा भरला संसार वाहून गेला तर कित्येक गाई गुरे बैल इत्यादी  जनावरे होत्याची नव्हती झालीत.मुसळधार पावसाने घरदारांची मोठ्या प्रमाणात हानी झाली असून ,अश्या वेळेस कंगना राणावत सारख्या निरर्थक बाबींकडे जातीने लक्ष देणारे विरोधी पक्षनेते कुठे गेलेत ?आमचा बळीराजा घोर अस्मानी संकटात असताना विरोधी पक्षनेते बिहारच्या निवडणुकीत मेजवान्या झोडण्याचे काम करीत आहेत का ,असा जळजळीत सवाल भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केला असून सरकारी पातळीवरून ह्या नुकसानग्रस्तांना त्वरित योग्य ती  नुकसान भरपाई देण्यात यावी अशी जाहीर मागणी सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी केली आहे.

आज मराठवाडा , विदर्भ , पश्चिम महाराष्ट्रात आणि अन्य ठिकाणी पावसाने जो हैदोस घातला आहे त्या ठिकाणी भिम आर्मीचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात स्थानिक शेतकरी बांधवांना दिलासा देण्याचे ,आधार देण्याचे काम करीत आहे.तसेच ज्यास्तीत ज्यास्त प्रमाणात नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना सरकारी मदत मिळवून देण्यासाठी भिम आर्मीचे कार्यकर्ते प्रयत्नशील असल्याचेही भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी सांगितले आहे.ह्या संकटग्रस्त बांधवांना अन्नधान्या पासून ते अन्य बाबींसह करता येईल ती मदत भिम आर्मीचे कार्यकर्ते करीत आहेत आणि करीत रहाणार असल्याचे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले असून शेतकरी बांधवांनी ह्या परिस्थितीत डगमगून न जाता खंबीरपणे ह्या आव्हानाचा मुकाबला करावा.कारण आपण महान चक्रवर्ती सम्राट अशोक , छत्रपती शिवाजी महाराज आणि विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे शूरवीर वंशज असून , सर्वस्व दान करणाऱ्या बळीराजाची आपण औलाद आहोत असे भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी शेतकरी बांधवांना धीर देताना म्हंटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट