
भंडारा जिल्ह्यातील वाढीव पाणीपुरवठा योजनांसाठी तांत्रिक आणि प्रशासकीय मान्यता तातडीने द्या-विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
- by Adarsh Maharashtra
- Oct 16, 2020
- 1451 views
मुंबई दि.१६ : महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत लाखांदूर, लाखनी, साकोली आणि मोहाडी (जिल्हा भंडारा) नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेअंतर्गत तांत्रिक व प्रशासकीय मान्यता देण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दिले. याठिकाणी पिण्याच्या पाण्याची अत्यंत निकड असून सर्व आवश्यक त्या परवानग्या व तांत्रिक बाबींची पूर्तत: तातडीने करण्यात येऊन लवकरात लवकर काम सुरू व्हावे आणि येथील नागरिकांना दिलासा मिळावा, अशा स्पष्ट सूचना त्यांनी दिल्या.
भंडारा जिल्ह्यात नगरपालिका आणि पंचायतीकरिता वाढीव पाणीपुरवठा योजनेसंदर्भात विधानभवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले, यावेळी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले हे बोलत होते. या बैठकीस नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी, प्रधान सचिव महेश पाठक, सहसचिव पांडूरंग जाधव, उपसचिव डॉ. माधव वीर, जलसंपदाचे अवर सचिव वैशाली कुरणे आदीसह संबंधित अधिकारी उपस्थित होते.
अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, पिण्याचे पाणी ही जीवनावश्यक गरज आहे. लाखांदूर प्रादेशिक पाणी पुरवठा योजना ही ग्रामीण निकषानुसार असल्याने आणि लोकसंख्या वाढल्याने या विभागात पाण्याचा तुटवडा भासत आहे. याचबरोबर लाखनी येथील पाणीपुरवठा योजना ही बंद असल्याने पाण्याचा प्रश्न उद्भवला आहे. याचबरोबर साकोली आणि सेंदूरवाफा गावची लोकसंख्या ही २४ हजार ८९० इतकी असून येथेही पाण्याची समस्या भेडसावत आहे. सदर योजनेसाठी लागणारी पुरवठा विहीर व ॲप्रोच ब्रिज, पाण्याची टाकी, जलशुद्धीकरण केंद्र यासाठीच्या तांत्रिक तसेच प्रशासकीय मान्यता देण्यासंदर्भात कार्यवाहीस वेग द्यावा, असे निर्देश अध्यक्ष नाना पटोले यांनी संबंधितांना दिले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम