
आंब्रड येथील धरणाचे काम तातडीने पूर्ण करावे- विधानसभा अध्यक्ष नाना पटोले
- by Adarsh Maharashtra
- Oct 16, 2020
- 1154 views
मुंबई, दि.१६ : सिंधूदुर्ग जिल्ह्याच्या कुडाळ तालुक्यातील आंब्रड येथील २०१६ मध्ये प्रशासकीय मान्यता देण्यात आलेल्या धरणाचे काम तातडीने पूर्ण करण्यासंदर्भात विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी दि. १५ ऑक्टोबर २०२० रोजी विधानभवन येथील दालनात आढावा घेतला. येत्या उन्हाळ्या पर्यत प्रकल्पाचे काम पूर्ण करण्याबाबत शासनाने लवकरात लवकर कार्यवाही करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
आमदार वैभव नाईक यांनी याबाबत निवेदन सादर केले होते. यावेळी मुख्य अभियंता सु. पां. कुशिरे, मृद व जलसंधारणचे उप सचिव वि. म. देवराज, अधीक्षक अभियंता, ठाणे सु. स. खांडेकर, कार्यकारी अभियंता य. ल. थोरात व इतर अधिकारी व प्रकल्पबाधित शेतकरी उपस्थित होते.
सदर धरणाचे काम पूर्ण झाल्यावर शेतकऱ्यांचा सिंचनाचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरुपी सुटण्यास मदत होणार आहे. या बैठकीत सुरु असलेल्या विहिरींच्या कामाबाबत चर्चा करण्यात आली. अतिरिक्त निधीची आवश्यकता असल्यास याबाबतचा प्रस्ताव लवकरात लवकर शासनाकडे पाठवून प्रकल्प पूर्ण करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष श्री. पटोले यांनी दिले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम