
अंधश्रद्धे पोटी ७० वर्षीय वृद्धाची हत्या करणाऱ्या सहा आरोपीना मुलुंड पोलिसांनी केली अटक!
- by Adarsh Maharashtra
- Oct 14, 2020
- 1197 views
मुंबई (जीवन तांबे)अंधश्रद्धे पोटी निष्पाप वयोवृद्ध व्यक्तीचा कट रचून, दुपारी देऊन निर्घृणपणे हत्या करणाऱ्या सहा आरोपीना मुलुंड पोलिसांनी अटक केली आहे.दीपक मोरे - वय ३९, विनोद मोरे वय ३०, मोहम्मद आसिफ नासिर शेख- वय २८, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी- वय २६, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान ३० शहानवाज उर्फ सोनू अख्तर शेख ३० असे आरोपीची नांवे आहेत.
मुलुंड पोलिस ठाणे अंतर्गत काही दिवसांपूर्वी एक मारुती लक्ष्मण गवळी या ७० वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली होती.या हत्येत मुलुंड पोलीसाना कोणताही पुरावा सापडत नव्हता.मात्र मारुती हे जोगवा मागत असत त्यामुळे या अनुषंगाने देखील पोलिसांनी तपास केला.या वेळी त्यांच्या समाजातील काही लोकांनी पोलिसांना यात अंधश्रद्धेचा अँगल असल्याचे सांगितले.
गेल्या महिन्यात कन्हैय्या मोरे या त्यांच्याच समाजातील व्यक्तीचा अचानक मृत्यू झाला होता, आणि त्याच्या मुलांना यात समाजातील काही लोकांनी करणी केल्याने त्यांचा मृत्यू झाल्याची संशय होता.
त्यांच्या अंतविधी साठी जे चार लोक समाजातील आले होते त्यांचे हे काम असावे म्हणून त्यांची हत्या करण्याची सुपारी त्यांची मुले दीपक मोरे आणि कन्हैया मोरे यांनी मोहम्मद आसिफ नासिर शेख, मोहम्मद मैनुद्दीन अन्सारी, मोहम्मद आरिफ अब्दुल सत्तार खान आणि शहानवाज ऊर्फ सोनू अखतर शेख यांना ७० हजार रुपयांची सुपारी दिली होती. ता.२ ऑक्टोम्बर ला या टोळीने यातील मारुती गवळी यांची हत्या केली.तर यातील दुसरा इसम गावाला गेल्याने त्याचा हत्येचा प्लँन आणि इतर आणखी दोघांचा प्लँन ही आखत होते. मात्र मुलुंड पोलिसांनी वेळेतच या सर्व हत्येचा छडा लावल्याने आणखी तीन हत्या रोखल्या गेल्या. मात्र अजून ही २१ व्या शतकात अंधश्रद्धा पोटी हत्या होत असल्याने चिंता व्यक्त होत आहे.
आपल्या वडिलांचा समाजातील लोकांनी करणी केल्याने मृत्यू झाला आहे.असा समज करून दोन भावानी समाजातील चार जणांच्या हत्येचा कट रचला होता.यातून एका वृद्धाची हत्या देखील झाली मात्र तीन जणांची हत्या करण्याआधीच मुलुंड पोलिसांनी त्या दोन भावनसह चार हत्येची सुपारी घेणार्यांना असे एकूण सहा जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम