धनगर समाजाच्या आरक्षण व आर्थिक विकासाच्या मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलणार - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

धनगर समाज शिष्टमंडळाशी विविध मुद्यांवर चर्चा

मुंबई १० :- धनगर समाजाच्या आर्थिक विकासाच्या व अन्य मागण्यांबाबत सकारात्मक पावले उचलली जातील. आरक्षणासाठी सातत्यपूर्ण पाठपुरावा करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी समन्वय साधला जाईलअसा विश्वास मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी धनगर समाज शिष्टमंडळाला दिला.

            धनगर समाजाच्या आरक्षण व विविध मागण्यांबाबत शिष्टमंडळाने   मुख्यमंत्री श्री. ठाकरे यांची शुक्रवारी ( दि.९) सह्याद्री राज्य अतिथीगृह येथे भेट घेतली. त्यावेळी मुख्यमंत्री श्री. ठाकरे बोलत होते.

            शिष्टमंडळासमवेत झालेल्या बैठकीस मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवारपरिवहन मंत्री ॲड. अनिल परबजलसंधारण राज्यमंत्री दत्तात्रय भरणेखासदार अनिल देसाई यांच्यासह मुख्य सचिव सीताराम कुंटेमुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिषकुमार सिंहवित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव राजगोपाल देवरा आदी उपस्थित होते.

            मुख्यमंत्री श्री. ठाकरे म्हणाले कीधनगर समाजाच्या आरक्षणाची मागणी खूप जूनी आहे. त्यामुळे या विषयाची कोंडी फोडण्यासाठी करता येतीलते सर्व प्रयत्न केले जातील. आरक्षणाच्या मार्गातील अडथळा दूर करण्यासाठी कायदेतज्ज्ञ आणि विविध घटकांशी विचारविनिमय करून सल्ला घेतला जाईल. तसेच या विषयाचा सातत्यपूर्ण पाठपुरावा व्हावा यासाठी समन्वयही साधला जाईल. समाजाच्या विकासासाठीच्या योजनांच्या आर्थिक तरतुदीबाबत निश्चितच सकारात्मक असे प्रयत्न केले जातीलअसेही त्यांनी सांगितले.

            मदत व पुनर्वसन मंत्री श्री. वडेट्टीवार यांनी धनगर समाजाच्या आरक्षणाच्या मागणीबाबत विविध स्तरांवर पाठपुरावा केला जाईल असे सांगितले.

            बैठकीत शिष्टमंडळातील माजी आमदार प्रकाश शेंडगेमाजी मंत्री आण्णा डांगेरमेश शेंडगेखासदार विकास महात्मेरामराव वडकुतेमाजी आमदार अनिल गोटेगणेश हाकेसुभाष खेमनारश्रीमती उज्ज्वलाताई हाके आदींनी आरक्षण आणि विविध मागण्यांच्या अनुषंगाने मांडणी केली.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट