
मान्यवर कांशीरामजींच्या परिनिर्वाण दिनी शासनकर्ती जमात बनण्याची शपथ घ्या : भिम आर्मी प्रमुख भाई चंद्रशेखर आझाद यांचे आवाहन.
- by Adarsh Maharashtra
- Oct 07, 2020
- 1292 views
मुंबई(प्रतिनिधी) येत्या ९ ऑक्टोबर रोजी बहुजन समाजाला आपले न्याय हक्क मिळवून देण्यासाठी आमरण संघर्ष करणारे मान्यवर कांशीरामजी यांचा परिनिर्वाण दिन असून ह्या दिवशी प्रत्येक बहुजन व्यक्तीने आणि भिम आर्मी तसेच आझाद समाज पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सुमारे ३ तास त्यांचे स्वचरित्राचे सामूहिक वाचन करून त्यावर सार्वत्रिक चर्चासत्र घडवून विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या स्वप्नातील प्रबुद्ध भारत निर्माण करून ह्या देशाची शासनकर्ती जमात बनण्यासाठी आपण सर्वांनी कटिबद्ध होऊया ,असे जाहीर आवाहन भिम आर्मी आणि आझाद समाज पक्षाचे सुप्रीमो संविधान रक्षक भाई चंद्रशेखर आझाद यांनी केले असल्याची माहिती भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.
अशोकभाऊ कांबळे यांनी ह्या पत्रकाद्वारे गुजरात आणि महाराष्ट्रातील भिम आर्मीच्या सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना जाहीरपणे सूचना दिल्या आहेत की प्रत्येक कार्यकर्त्याने ९ ऑक्टोबर रोजी परिनिर्वाण दिनानिमित्त आंबेडकरी चळवळीवर चिंतन आणि मंथन करून आंबेडकरी चळवळ अधिकाधिक भक्कम करून तिला सक्षमपणे भाई चंद्रशेखर आझाद यांच्या पाठीशी कशी उभी करता येईल ,याचा सारासार विचार विनिमय करून पुढील भीमकार्याला सुरुवात करावी ,इतकेच नव्हे तर आपल्या ह्या संघर्षात इतर जाती समूहांना , परिवर्तनवादी संघटनांना सामील करून घेण्यासाठी सज्ज असावे अश्या जाहीर सूचना अशोकभाऊ कांबळे यांनी कार्यकर्त्यांना केल्या आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम