डेकोरेटर्सच्या प्रतिनिधींनी आपल्या मागण्यांसाठी घेतली शरद पवार यांची भेट

मुलुंड :(शेखर भोसले)  जे सभागृह (हॉल) १०० व्यक्तींची क्षमता असलेले आहे त्या सभागृहात १०० व्यक्तींना घेऊन कार्यक्रम करायला परवानगी शासनाने जाहीर केलेल्या अनलॉकच्या नियमानुसार देण्यात आली आहे परंतु जे सभागृह १००० किंवा २००० व्यक्तींच्या क्षमतेचे आहे किंवा ज्यांना खुल्या मैदानात कार्यक्रम करायचा आहे त्यांनासुद्धा १०० व्यक्तींनाच घेऊन कार्यक्रम करण्याची परवानगी शासनाकडून देण्यात आली असून सदर नियमावलीत बदल करणे आवश्यक आहे व ही बाब शासनाच्या निदर्शनास आणून द्यावी म्हणून नॉर्थ ईस्ट मुंबई डेकोरेटर्स अँड हायर्स वेल्फेअर असोसिएशन  आणि कॅटरर्स व इव्हेंट मॅनेजमेंट पदाधिकाऱ्यांनी 
मंगळवार दिनांक ६ ऑक्टोबर रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष, खासदार शरदचंद्र पवार यांची भेट घेतली व महाराष्ट्र शासनाने जाहीर केलेल्या नियमावलीत, सूचनांमध्ये काही बदल करावेत, अशी विनंती करत त्यासंबंधीचे एक निवेदन शरद पवार यांना या भेटीत देण्यात आले. प्रत्येक हॉलच्या क्षमतेनुसार  ५० ते ६० टक्के लोकांना कार्यक्रमासाठी प्रवेश देण्यात यावा अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.  

असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी खासदार शरदचंद्र पवार व लोकसभा खासदार सुप्रिया सुळे यांची भेट घेवून त्यांच्याशी या विषया संबंधात सविस्तर चर्चा केली. सदर बाब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या निदर्शनास आणून देण्याचे आश्वासन शरद पवार व सुप्रिया सुळे यांनी या भेटीत दिले आहे. सदर बाब अतिशय रास्त असल्याचे सुप्रियाताई सुळे यांनी सांगून शासनाला याबद्दल अवगत करून तातडीने नियमावलीमध्ये बदल करण्याची सूचना केली जाईल, असे सांगितले. 

यावेळी अध्यक्ष सुशिल मर्चंट, सहसचिव जितूभाई कोठारी, नरेंद्र कचालीआ, खजिनदार विजय ठक्कर, सहखजिनदार महेश जोयसर, समन्वयक रमेश बारोट, राकेश सेनवा, प्रियांक गांगर, अभिजित चव्हाण उपस्थित होते. कचालीआ, खजिनदार विजय ठक्कर, सहखजिनदार महेश जोयसर, समन्वयक रमेश बारोट, राकेश सेनवा, प्रियांक गांगर, अभिजित चव्हाण उपस्थित होते.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट