शेतकऱ्यांची फसवणूक करून लुबाडणाऱ्यां वर कडक कारवाई करणार - पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर

मुंबई (प्रतिनिधी) शेतकऱ्यांची लाखो करोडो रुपयांची फसवणूक करून त्यांना लुबाडण्याच्या घटना रोज घडत आहेत , म्हणून नाशिकचे विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी शेतकऱ्यांना फसविण्याऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. जे व्यापारी शेतकऱ्यांना घामाच्या कष्टाची कमाई देणार नाहीत , त्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करण्यात येईल ‌. तसेच जो पर्यंत फसवणूक झालेल्या शेतकऱ्यांना त्यांची गेलेली कमाई त्यांना पुन्हा परत मिळत नाही तोपर्यंत त्रासलेले शेतकरी शांत बसणार नाहीत. जेव्हां  एका कार्यक्रमाच्या वेळी पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर एका ठिकाणी दौरा करीत होते तेव्हां काही शेतकऱ्यांनी त्यांना फसविणाऱ्या व्यापाऱ्यांची तक्रार पोलीस महानिरीक्षक डॉ.प्रताप दिघावकर यांच्या कडे केली. या तक्रारीची दखल घेऊन पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी नाशिक मधील सर्व पोलीस स्टेशनच्या अधिकारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना शेतकरी फसवणूकीच्या अशा घटना पासून सतर्क राहावे अशी सूचना केली. तसेच शेतकऱ्यांना त्रास देणाऱ्या व्यापाऱ्यांवर त्वरीत कडक कारवाई करून शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्याचे सक्त आदेश दिले. या संबंधी शेतकऱ्यांची तक्रार नोंदवून न घेतल्यास अशा पोलीस अधिकाऱ्यावर कारवाई करण्यात येईल. पोलीस महानिरीक्षक डॉ. प्रताप दिघावकर यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारी कडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांवर आणि पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल असे स्पष्ट संकेत दिले.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट