
उल्हासनगरात मनविसेच्या वतीने रोजगार मेळाव्याचे आयोजन .
- by Rameshwar Gawai
- Oct 01, 2020
- 513 views
उल्हासनगर(प्रतिनिधी) : लॉकडाऊन मुळे सर्व रोजगार डुबले असुन बेरोजगारी वाढली आहे . त्यामुळे या संवेदनशिल काळात बेरोजगाराना रोजगार मिळावा म्हणुन उल्हासनगर येथिल मनविसे चे शहर उपाध्यक्ष ॲड कल्पेश माने यानी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले असुन या मेळाव्यात ३०० बेरोजगारानी सहभाग नोंदवला आहे .
उल्हासनगर शहरात लॉकडाऊन सुरु झाल्या पासुन सर्व नागरिकांचे काम धंदे बंद पडले आहेत . त्यामुळे बेरोजगारी वाढत चालली आहे . तेव्हा या अनलॉक मध्ये काही प्रमाणात कारखाने सुरु झाले आहेत . त्यामुळे उल्हासनगर मनविसेचे शहर उपाध्यक्ष ॲड कल्पेश माने यानी रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे . या मेळाव्यात ३०० बेरोजगार नागरिकानी सहभाग नोंदवला असुन या बेरोजगाराना १०० टक्के नोकरी लागन्याची शक्यता ॲड. माने यानी व्यक्त केली आहे .
रिपोर्टर
आदर्श महाराष्ट्र वेब टीम