बेवारस रिक्षा बनली तळीरामांचा अड्डा ! चालतात अनैतिक धंदे ! पालिका अधिकाऱयांचे दुर्लक्ष !!

मुलुंड :(शेखर भोसलेमुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीतील संकल्प इमारतीच्या जवळ एक रिक्षा (रिक्षा क्र.: एमएच०३ बीटी ७४३९) गेल्या कित्येक महिन्यांपासून बेवारस अवस्थेत उभी असून, ह्या रिक्षाचे तिन्ही टायर पंचर आहेत. रात्रीच्या वेळेत येथे असलेल्या अंधाराचा फायदा घेत काही तळीराम येऊन या रिक्षात दारू पीत बसतात. त्यामुळे रिक्षाच्या सभोवती रस्त्याच्या कडेने दारूच्या बाटल्यांचा खच पडलेला दिसून येतो. रिक्षा खूप दिवसांपासून उभी असल्याने सभोवती कचरा जमा झाला आहे परंतु पालिका कर्मचाऱ्यांना या बेवारस रिक्षामुळे तेथे साफसफाई करणे जमत नाही आहे. तसेच येथे वर्दळ कमी असल्याने काही वेळा युवा कपल्स देखील आत बसून अनैतिक चाळे करत असल्याचे स्थानिकांनी सांगितले आहे. 


पालिकेच्या टी वॉर्डातील अधिकारी भोजने यांचे सदर बाबीकडे लक्ष वेधून कारवाई करण्याची मागणी केली असता सुरुवातीला त्यांनी "बघतो" असे उत्तर देवून वेळ मारून नेली. काही दिवसांनी पुन्हा भोजने यांना आठवण केली असता त्यांनी पोलिस स्टेशनला सांगा असे सांगितले नंतर काही वेळाने टोविंग वॅन उपलब्ध नाही आहे त्यामुळे कशी रिक्षा उचलणार असे उत्तर दिले. टॊविंग वॅनच्या गाडीचे, दुसरे अधिकारी भोये बघतात त्यामुळे टोविंग वॅन उपलब्ध झाली तर उचलू असे मोघम उत्तर दिले. त्यानंतरही १० दिवस उलटले तरी अद्याप काहीच कारवाई करण्यात आली नसून रिक्षा आहे तेथेच आहे व त्यात रात्रीच्या वेळेत तळीराम आपला कार्यभार साधत असतात, असे स्थानिकांनी सांगितले. 

पालिका अधिकाऱयांच्या बेपर्वाई वृत्तीमुळे व बेजबाबदार वागणुकीमुळे उद्या जर कां एखादी दुर्घटना घडली तर कोण जबाबदार असा प्रश्न स्थानिक रहिवाशी यानिमित्ताने विचारत असून जर ही बेवारस रिक्षा तेथून हटली तर रात्रीच्या वेळेत होणारी तळीरामांची तेथील गर्दी बंद होईलच त्याचबरोबर परिसर देखील स्वच्छ होईल तसेच स्थानिकांना विशेषतः महिला वर्गाला तेथून मुक्तपणे ये - जा  करता येईल असे परिसरातील रहिवाशांनी सांगितले. 

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट