गणेश जनसेवा मंडळ,गेले ते दीवस,राहील्या त्या फक्त आठवणी.

डोंबिवली:तीस वर्षापूर्वीचे ते दीवस डोंबिवलीवरुन सकाळी एक ठराविक वेळी ट्रेन पकडण हे नित्याचच झाल होत.तीच ट्रेन,तीच बसण्याची जागा,त्याच परिचित व्यक्ती,ओळख वाढते,मैत्री जमते संध्याकाळचीही तीच परिस्थिती,ऑफीस सुटल्यावर सकाळचेच मित्र संध्याकाळच्या ठरलेल्या ट्रेनने डोंबिवलीत उतरण.स्टेशन समोर असलेल्या हॉटेलमध्ये बसण,हे नित्याच होत.या कालावधीत मौजमजा केली,पार्ट्या केल्या,पिकनिक केल्या. सर्व मित्रांनी जीवाची मुंबई केली.हे सर्व करत असताना आपण समाजाच काही देण लागतो याची जाणीव झाली. व सामाजिक बांधिलकी म्हणून आपटे साहेब यांच्या नेतृत्वाखाली व प्रदीप जोशी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली गणेश जनसेवा मंडळाची स्थापना करण्यात आली.आपटे साहेब मंडळाचे अध्यक्ष व प्रदीप जोशी साहेब सेक्रेटरी यांच्या सारख्या अनुभवी,प्रतिभावंत व्यक्तीरेखांच्या अधिपत्याखाली मंडळाची वाटचाल सुरू झाली.यात संजय वगळ,अशोक लंगडे, शिवराम चव्हाण, गजानन जोशी,शाम जोशी,ज्ञानेश्वर माळवदकर,सत्यवान मुसळे, जी.आर.जोशी,विजय मेंढे,प्रमोद जोशी विजय वगळ,खंदारे वकील उदय कुर्डुरकर डॅडी अशा अनेक व्यक्ती जोडल्या गेल्या. गणेश जनसेवा मंडळाच्यावतीने राबविण्यात येणा-या उपक्रमांसंदर्भात आपटे साहेब, जोशी साहेब यांच्या घरी मिटींग होऊ लागल्या.सकारात्मक विचारांची देवाण-घेवाण झाली.चर्चा झाली.त्यानंतर गणेश जनसेवा मंडळाच्या कार्यक्रमांना,उपक्रमांना सुरुवात झाली.मोफत आयुर्वेदीक आरोग्य शिबिर,देवदर्शन,दहावी उत्तीर्ण विद्य्यार्थांचा सत्कार, कौटुंबिक हळदीकुंकु समारंभ असे अनेक उपक्रम मंडळाच्या माध्यमातून घेण्यात आले.आता त्यातील काही मित्र वयोमाना नुसार सेवा निवृत्त झाले आहेत.त्यांची मुल मोठी झाली,चांगल्या नोकरीला आहेत.गणेश जनसेवा मंडळाच्या या गोतवळयातील मुलांची लग्न झाली,त्यांना मुल झाली.आता हेच मित्र आपल्या मुलांसोबत,नातवंडे, सुनाच्या संसारात आनंदाने रमत आहेत. सर्वांची कारकीर्द समधानकारक व यशो-शिखरावरच आहे.प्रत्येक जण आपापल्या परीने काम,धंदा, व्यवसाय, नोकरी यात यशस्वी झालेले आहेत. आपल्या या सामाजिक कार्यात आपल्या घरातुनही तेवढाच महत्त्वाचा व मोलाचा कौटुंबिक पाठींबा मिळालेला आहे.कोरोना संसर्गामुळे भेटीगाठी होत नाहीत.सर्वांनींच दैदीप्यमान व गौरवशाली यश संपादन केलेल आहे. सांगाव तेवढ थोडच आहे.शेवटी काय,गेले ते दीवस राहील्या त्या आठवणी.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट