
भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली गरीब कलावंतांच्या जगण्यासाठी भिम आर्मी आंदोलनाच्या पावित्र्यात.ठाण्यात होणार आंदोलन.
- by Adarsh Maharashtra
- Sep 26, 2020
- 1204 views
मुंबई(प्रतिनिधी): "माझी १० भाषणं आणि जलसाकाराचे एक गाणं , हे बरोबरीचे आहे", असे साक्षात भारतीय संविधान निर्माते , विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर ज्यांच्या बद्दल नेहमी म्हणत , तोच कलावंत आज लॉकडावूनमुळे उपासमारीने मरणपंथाला लागला आहे. फक्त हाच कलावंत नाही तर, शाहीर-कवी-गायक-गोंधळी-नाट्यकर्मी-अभिनेता-वाघ्यामुरळी-पोतराज-बहुरूपी-विविध वाद्य वादक कलावंत-तमाशा कलावंत-भजनी मंडळ-बँजो पथक-संबळ पथक-नकलाकार-ऑर्केस्ट्रा कलावंत-ऑर्केस्ट्रा मधील डान्सर इत्यादी कोणत्याही कलावंतांना मार्च महिन्यापासून सध्या तरी कुठलेही सांस्कृतिक कार्यक्रम नसल्याने त्यांच्यासमोर आर्थिक टंचाई निर्माण झाली असून,त्यांची जगण्यासाठीची लढाई सुरू झालेली आहे..... ह्या सर्व कलावंतांचा उदरनिर्वाह केवळ आपल्या ह्याच कलेवरती होता ,आज तेच बंद असल्याने त्यांच्यासाठी भयानक परिस्थिती निर्माण झाली आहे.अशा भयावह परिस्थितीत महाराष्ट्रातील कलावंतांना महाराष्ट्र राज्य शासनाने "तात्काळ ५० हजार रुपये"आर्थिक मदत देऊन , त्यांना जगवावे , अशी जाहीर मागणी भिम आर्मीचे राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी राज्यशासनाकडे केली आहे.
ह्यासाठी महाराष्ट्रातील सर्व तळागाळातील उपेक्षित/दुर्लक्षित/वंचित आणि ज्यांचा उदारनिर्वाह हा फक्त आपल्या कलेवरती अवलंबून आहे....अशा सर्वच स्तरातील ,माळरानावरील/पालावरील/झोपडीतील/गावखेड्यातील/जिल्ह्यातील/तालुक्यातील सर्व जातीधर्माच्या कलावंतांनी आपली नावे भिम आर्मीकडे नोंद करून ,आपली यथायोग्य माहिती (बायोडाटा) द्यावी ,असे आवाहन सुद्धा भिमपँथर मा.राजेश गवळी यांनी ह्यापुर्वीच कलावंतांना केले होते , त्यानुसार हजारो कलावंतांनी आपली नावे भिम आर्मीकडे दिली आहेत.
ह्या सर्व गरजू कलावंतांची यादी राज्याचे मुख्यमंत्री मा.उध्दवजी ठाकरे व सांस्कृतिक कार्यमंत्री मा.अमितजी देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार असल्याची माहिती भिमपँथर मा.राजेश गवळी आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ नाट्यअभिनेते मा.यशवंत शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली असून , ह्या प्रश्नांवर लवकरच येत्या १५ दिवसांत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भिमपँथर मा.राजेश गवळी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो कलावंत जमून आपले निवेदन जिल्हाधिकारी महोदयांना देतील अशीही माहिती यशवंतराव शिंदे यांनी दिली असून कलावंतांनी अधिक माहितीसाठी ९०८२८०७६३९ / ९८६९७१०३५२ ह्या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे .
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम