
सायन, माटुंगा, चुनाभट्टी, चेंबूर, वाशीनाका, गोवंडी, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी,भाग जलमय!
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1049 views
मुंबई (जीवन तांबे ) मुंबई उपनगरात कित्येक दिवसापासून दडी मारलेल्या पावसाने गेल्या दोन तीन दिवसापासून संध्याकाळी हजेरी लावत असताना काल अचानक संध्याकाळी जोर धरला असता काही तासात विविध भागात पाणी साचल्याने सर्व परिसर जलमय झाला होता.
चुनाभट्टी रेल्वे स्थानकात पाणीच पाणी!परिसरातील मुले पोहण्याचा आनंद घेताना
चुनाभट्टी रेल्वे स्थानक मार्ग, दादर, चेंबूर, वाशीनाका, गोवंडी, कुर्ला, टिळकनगर, विक्रोळी, अंधेरी अशा विविध ठिकाणी पाणी साचले होते.कुर्ला सबवे तर पूर्ण पाण्याने भरून गेला असल्याने घाणीच्या पाण्यातून प्रवाशां मार्ग काढावा लागत आहे.
कुर्ला, चुनाभट्टी रेल्वे स्थानकात मोठया प्रमाणात पाणी साचल्याने परिसरातील मुले पोहण्याचा आनंद लुटल दिसत आहे.
चुनाभट्टी येथील स्वदेशी मिल चाळ, सिद्धार्थ कॉलनी, पीएल लोखंडे मार्ग, टिळकनगर, एव्हरार्ड नगर, कुर्ला बुद्ध कॉलनी, कुर्ला डेपो येशील झोपडपट्टीत पाणी रात्री शिरल्याने नागरिकांना घराबाहेर तर घरात रात्र जाऊन काढावी लागली आहे. त्यामुळे पाणी साचल्याने घरातील कित्येक सामानाची मोठ्या प्रमाणात नुकसान झाली आहे.
वयोवृध्द, गरोदर महिला, नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. चेंबूर, कुर्ला, गोवंडी रेल्वेरूळ पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत.
ठाणे सायन मार्गावर पाणी साचल्याने वाहतुक कोंडी निर्माण झाली होती. पाऊस कमी झाल्याने काही साचलेले पाणी कमी झाले होते.
प्रतिक्रिया
१) जितेंद्र शिंदे- रात्री पाऊस सूरू झाल्यावर २ तीन च्या दरम्यान पाणी घरात शिरले त्यामुळे घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तर काही सामान वाहून गेले आहे. मुलांना किचन ओट्यावर ठेवून रात्र जागून काढावी लागली आहे.नोकरी सुटली आहे.घरातील रेशन ही वाहून गेले आहे.
२)प्रतिभा यादव-घरातील बहुतेक सामानाचे नुकसान झाले आहे. घरात खाण्याकरिता डब्यात भरून ठेवले रेशन वाहून गेले आहे तर काही धान्य ओले झाले असल्याने या लोळडॉऊन मध्ये पुन्हा जगावं कसे असा प्रश्न निर्माण झाले आहे.घरात कोणीच कमवते नसल्याने हाल होत आहे. त्यात हा पाऊसाने नुकसान केले आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम