
दोन महिने उलटून देखील हत्या झालेल्या मृत्यदेहाची ओळख पटेना!
- by Adarsh Maharashtra
- Sep 23, 2020
- 1127 views
मुंबई (जीवन तांबे) देवनार पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या घाटकोपर मानखुर्द लिंक मार्गावर पुलाखाली एका 50 वर्षीय व्यक्तीची गळा दाबून हत्या करण्यात आली होती याप्रकरणातील आरोपीना अटक ही करण्यात आली आहे. मात्र दोन महिने होऊन देखील या मृत्यूदेह झालेल्या व्यक्तीची ओळख अद्याप पटली नसल्याने देवनार पोलिसांना मनस्ताप सहन करावा लावत आहे. शिवाजी नगर पोलिसांना हा मृत्यूदेह घाटकोपर मानखुर्द लीक मार्गावर ता.18 जुलै रोजी आढळला होता. शवविच्छेदन केल्यानंतर त्याची हत्या करण्यात आल्याचे निष्पन्न झाले होते.या प्रकरणी देवनार पोलीसानी तपास करून एका चालकाला या गुन्ह्यात अटक केली होती. त्याने चोरीच्या उद्देशाने या व्यक्तीचा गळा दाबून हत्या केली असल्याचे कबूल केले होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम