
महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने केलेल्या मागणी संदर्भात उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी संबंधित अधिका-यांना सूचना दिल्या.
- by Adarsh Maharashtra
- Sep 16, 2020
- 1634 views
मुंबई,दि.१६: मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्यामुंबईतील बाजार आवारात माल येऊन माथाडी कामगारांना कामे व मजुरी मिळावी माथाडी अॅक्ट,१९६९ या अधिनियमांतर्गत गठीत केलेल्या माथाडी मंडळामार्फत माथाडी कामगारांच्या वेतनातून राष्ट्रियकृत बँक सहकारी बँक,पतपेढ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची कपात न करण्याबाबत कामगार विभागाने काढलेला दि.०५ मार्च,२०१९ चा शासन निर्णय मागे घेणे,ज्या माथाडी कामगारांची कामे बंद व कमी झालेली आहेत अशा कामगारांच्या माथाडी मंडळात नांवे जमा असलेल्या प्रा.फंडाच्या रक्कमेतून पतपेढी कडून घेतलेल्या कर्जाची थकीत रक्कम अदा करण्याबाबत महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सभासदांच्यावतिने केलेल्या मागणी संदर्भात योग्यती कार्यवाही करण्याच्या सूचना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी संबंधित अधिका-यांना दिल्या.
माथाडी कामगारांच्या प्रश्नासंदर्भात महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी दि.१६ सप्टेंबर ,२०२० रोजी मंत्रालयात संयुक्त बैठक आयोजित केली होती, या बैठकिस महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री ना.दिलीप वळसे-पाटील,पणन व सहकार मंत्री ना.बाळासाहेब पाटील,महाराष्ट्र राज्य माथाडी,ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियननचे नेते नामदार नरेंद्र अण्णासाहेब पाटील,माजी मंत्री व आमदार शशिकांत शिंदे,कार्याध्यक्ष गुलाबराव जगताप,संयुक्त सरचिटणीस चंद्रकांत रामदास पाटील पोपटराव देशमुख,पणन व कामगार विभागाचे प्रधान सचिव,कामगार विभागाचे उप सचिव,कामगार आयुक्त आदी अधिकारी उपस्थित होते.
कोरोना या महाभयंकर संसर्गजन्य रोगाला रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने सर्व ठिकाणी लॉकडाऊन जाहिर केला होता,या संकटामुळे माथाडी कामगारांच्या काम व मजूरीवर परिणाम झाला असून,कामगारांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजुक झालेली आहे. बृहन्मुंबईतील गर्दी कमी करण्यासाठी घाऊक बाजारपेठा मुंबई कृषि उत्पन्न बाजार समितीच्या नव्या मुंबईतील आवारात स्थलांतरीत करण्यात आल्या,परंतु सरकारने शेतक-यांच्या हितासाठी बाजार समितीचे नियमण काढले आहे,परंतु सरकारच्या या धोरणाचा शेतक-यांना फायदा न होता अन्य घटकाला होऊन बाजार आवारातील माथाडी,वारणार,मापाडी,पालावाला महिला व अन्य घटकांवर बेकारीचे संकट ओढविण्याची भिती निर्माण झाल्याने बाजार आवारात माल येण्यासाठी व माथाडी कामगार व अन्य घटकांना हक्काची कामे मिळण्यासाठी सरकारने उपाययोजना करावी,अशी मागणी संघटनेने केलेली आहे. तसेच पतपेढ्यांकडून घेतलेल्या कर्जाच्या हप्त्याची रक्कम कपात करु नये असा शासनाच्या कामगार विभागाने दि.०५ मार्च,२०१९ चा शासन निर्णय काढलेला आहे,तो मागे घेण्याची आणि थकीत कर्जाची रक्कम कामगारांच्या नांवे मंडळात जमा असलेल्या प्रा.फंडाच्या रक्कमेतून अदा करण्याची मागणी केली आहे,यासंदर्भात राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांनी तातडीने बैठक आयोजित केली व कार्यवाहीच्या सूचना केल्या, त्याबद्दल माथाडी कामगार नेत्यांनी कामगारांच्यावतिने त्यांचे आभार व्यक्त केले आहेत.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम