
यूपीतील मिर्ची गँगचा मोहरक्या मुंबई पोलिसांच्या जाळ्यात,उद्योगपती, राजकीय हत्येत एक वर्षांपासून फरार !
- by Adarsh Maharashtra
- Sep 06, 2020
- 1368 views
मुंबई ( जीवन तांबे ) सप्टेंबर महिन्यात 2019 ला मिर्ची गँगचा मोरहक्या आणि त्याच्या साथीदारांनी धौलाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका स्थानिक राजकीय नेत्यांची चारचाकी वाहनातून येऊन बेछूट गोळीबार करून राजेश शर्मा (३५) हत्या दिवसाढवळ्या केली आणि पोबारा केला. तर नोएडा परिसरात फेज-३ मध्ये याच टोळीने उद्योगपती गौरव चांडेल (४५) याची जानेवारी 2020 मध्ये हत्या केली. दोन्ही हत्येनंतर त्यांनी पोबारा केला. या प्रकरणी धौलाना आणि नोएडा फेज-३ पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा नोंदविण्यात आला.
मिर्ची गँगच्या सातत्याच्या गुन्हेगारी कारवाया सुरू होत्या, ही गॅंग हत्येसाठी चोरीची वाहने वापरीत होती. ते पोलिसांना गुंगारा देत असल्याने त्यांच्यावर अडीच लाखाचे बक्षीस उत्तर प्रदेश पोलिसांनी जाहीर केले होते. मिर्ची गॅंगचा मोहरक्या गुन्हे करून पंजाब, हरियाणा, दिल्ली आणि महाराष्ट्रात लापायचा अनेकवेळा युपी पोलिसांनी विविध राज्यात धडक कारवाई केली मात्र मोहरक्या आणि त्याचे साथीदारांनी पोलिसांना गुंगारा दिला. या आरोपींच्या शोधासाठी युपी पोलिसांचे पथक मुंबईत आले होते. वरिष्ठांनी पथकाला सहकार्य करण्यासाठी गुन्हे शाखा युनिट-11 च्या पथकास सांगितले. मिर्ची गॅंगचा मोहरक्या हा मुंबईत वेष आणि ओळख लपवून राहत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सपोनि झिने याना माहिती मिळाली. पथकाने खबऱ्यांचे जाळे पसरविले आणि आरोपींचा मागोवा काढीत ता. 5 सप्टेंबर, 2020 रोजी इरले मार्केट प्रेमनगर विलेपार्ले पश्चिम येथून अटक केली. त्यांनी दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली. आशु ऊर्फ प्रवीण उर्फ आकाश राजेंद्र सिंग वय 32 मुंबईत प्रेमनगर, विलेपार्ले आणि यूपीत जिल्हा गजियाबद आणि जिल्हा मेरठ या ठिकाणी राहत होता. अखेर मुंबई गुन्हे शाखा युनिट 11 च्या पथकाने मिर्ची गॅंगचा मोहरक्याला अटक केली
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम