
चैत्यभूमीचे दरवाजे उघडा. भीम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांच्या नेतृत्वाखाली चैत्यभूमीवर भिम आर्मीचा सत्याग्रह.
- by Adarsh Maharashtra
- Sep 02, 2020
- 1079 views
मुंबई-2-(प्रतिनिधी) कोरोनाकाळात मागील पाच महिन्यांपासून संविधाननिर्माते , विश्वरत्न बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अभिवादनापासून वंचित असलेल्या चैत्यभूमीचे दरवाजे खुले करावे सोबतच येथील पुस्तक स्टाॅल देखील सुरू करावेत या मागणीसाठी भीम आर्मी भारत एकता मिशन या सामाजिक संघटनेने आज भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते मा.अशोकभाऊ कांबळे आणि महाराष्ट्र राज्य कोअर कमिटीचे प्रमुख मा.राजूभाई झनके यांच्या नेतृत्वाखाली दादर चैत्यभूमीवर सत्याग्रह आंदोलन केले.
कोरोना संक्रमणामुळे मार्च २०२० पासून देशातील करोडो लोकशाहीवादी जनतेची उर्जाभूमी-प्रेरणाभूमी असलेल्या मुंबईतील दादरच्या शिवाजी पार्क चौपाटी येथील चैत्यभूमीचे दरवाजे बंद करण्यात आले आहेत. दादर चैत्यभूमीवर कोणतेही कर्मकांड केले जात नाही तर लोक या ठिकाणी अभिवादन करून उर्जा घेऊन जात असतात सोबतच फुले शाहू आंबेडकरी व परिवर्तनवादी विचारांचा खजिना असणारे पुस्तके घेऊन जात असतात. मात्र दररोज चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणा-या जनतेचा मात्र चैत्यभूमीचे दरवाजे बंद करण्यात आल्याने हिरमोड होत आहे.त्यामुळे आता बहुतेक ठिकाणी लॉकडाऊनच्या नियमांमध्ये शिथिलता आणल्या गेली असून चैत्यभूमी सुद्धा जनतेसाठी खुली करण्यात यावी म्हणून भिम आर्मीने सरकारकडे मागणी केली.आज भाद्रपद पौर्णिमेनिमित्त भीम आर्मीने आपल्या ह्याच मागणीकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी चैत्यभूमीवर महाबुध्दवंदना घेऊन महामानव डाॅ बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले. भीम आर्मी भारत एकता मिशनचे राष्ट्रीय कार्यकारीणी सदस्य व माजी महाराष्ट्र प्रमुख मा.अशोकभाऊ कांबळे तसेच महाराष्ट्र कोअर कमिटी प्रमुख राजूभाई झनके यांच्या नेतृत्वाखाली शांततेत झालेल्या ह्या सत्याग्रही आंदोलनात भीम आर्मीचे महाराष्ट्राचे उपाध्यक्ष मा.रमेशचंद्र बालेश, वरिष्ठ महासचिव मा.अविनाशजी गायकवाड मा.प्रवक्ते महादूजी पवार, मुंबईचे प्रमुख पदाधिकारी भिमटायगर किसनभाई ओव्हाळ संतोष वाकळे, अविनाश गरूड , अविनाश समींदर , विजय कांबळे, श्रीकांत धावारे , उपासक गायकवाड,संतोष गायकवाड प्रीतेश चितळे,विवेक कांबळे,योगिनीताई पगारे,वैभव उजगरे, सुनील वाकोडे,प्रशांत वाघमारे, सचिन धावरे, श्रीकांत धावारे, विकी गायकवाड, उत्तम गायकवाड, प्रकाश लोंढे, संजय गायकवाड, अमित तांबे,संतोष गायकवाड, किशन ओव्हाळ, तेजस, मायकल विजय कांबळे, सीमा ताई पीहाल, सागर कांबळे यांच्यासह अन्य सदस्य उपस्थित होते.
पोलिसांनी कोरोनाच्या शासकीय नियमा नुसार मोजक्याच लोकांना चैत्यभूमीवर येऊ दिले,ह्यावेळी फिजिकली डिस्टनसिंगचे पूर्णपणे पालन करीत उपस्थित असलेल्या सत्याग्रही आंदोलकांसमोर बोलताना भिम आर्मीचे राष्ट्रीय नेते अशोकभाऊ कांबळे यांनी येत्या १० दिवसांत चैत्यभूमीचे दरवाजे सर्वसामान्य जनतेसाठी खुले करण्यात यावे अन्यथा भिम आर्मी संपूर्ण महाराष्ट्रात भव्य संवैधानिक आंदोलन छेडेल अशी जाहीर घोषणा केली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम