
विविध मागणी करिता चेंबूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एम पश्चिम कार्यलयावर मोर्चा!
- by Adarsh Maharashtra
- Aug 31, 2020
- 1751 views
मुंबई दि.31(जीवन तांबे) चेंबूर येथील सिद्धार्थ कॉलनी परिसरातील घाणीचे साम्राज्य पसरलेले असल्याने याबाबत पालिका एम पश्चिम विभागात तक्रार करून देखील सरर्सपणे दुर्लक्ष करीत असल्याच्या निषेर्धात आज चेंबूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालिका एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.
घाटकोपर सायन मार्गावर आंबेडकरी चळवळीचा बालेकील्ला समजला जातो.
या परिसरात एसआरए प्रकल्प कित्येक वर्षे विकासकांनी प्रकल्प रखडवल्याने यांचे प्रायश्चित सामान्य रहिवाशांना भोगावे लागत आहे.या परिसरात घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे. सिद्धार्थ कॉलनीतील मार्ग बनवून देखील पावसाळ्यात या मार्गावर घाणीचे पाणी साचत आहे.
या घाणीच्या पाण्यातून नागरिकांना मार्ग काढावा लावत आहे. या समस्यांचा सामना करीत असताना चाळ क्रमांक- सी- चार व सहा मधील शौचालयाची मलणीसा:रण लाईन पूर्ण भरली आहे. गाथा बुध्द विहार येथे गटारे तुंबले असून पाण्याच्या निचरा होत नाही.पिण्याच्या पाईप लाईन मधून घाण येते. चाळ क्रमांक 7 येथील देखील घाणीचे साम्राज्य आहे.झिगझग मित्र मंडळ येथे शौचालय पूर्ण भरले आहे व टाक्या भरल्या आहेत. त्यातील मळ चाळीत व आजूबाजूला परत असल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य पसलेले आहे. रहीवाशांना शौचालयाला व बाहेर कामा निमित्त जाताना नाक मुठीत धरून जावे लागत आहे. या परिसरात दुर्गनधी पसरल्याने परिसरात साथीचे रोग व डास पसरलेले आहे. त्यामुळे रहिवाना रहाणे मुस्किल झाले आहे.
याबाबत रहिवाशी यांनी पालिका व प्रतिनिधी यांना तक्रार केली असता ते दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप करीत पालिका एम पश्चिम कार्यालयावर मोर्चा काढत निषेध केला.
या सिद्धार्थ कॉलनीतील रहिवाशी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने पालीका अधिकारी यांना हे काम मार्गी लावावे याकरिता निवेदन दिले आहे. जर काम लवकरात लवकर मार्गी लावले नाही तर येत्या तीन तारखेला तीव्र आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.
या मोर्चात माजी तालुका अध्यक्ष लवूजी कांबळे, मुबई उपाध्यक्ष सचिन गवारे, ईश्र्वर घायवट, रत्ना विमल, कमल भडांगे सहभाग घेतला होता
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम