राष्ट्रसंत गाडगेबाबा , महान अहिंसावादी स्वामी शांतीप्रकाश महाराज यांस भारतरत्न व महान महाकवी वामनदादा कर्डक तसेच महागायक प्रल्हाददादा शिंदे यांस महाराष्ट्र भूषण पुरस्काराने गौरविण्यात यावे.-भिम आर्मीची जाहीर मागणी.

मुंबई(प्रतिनिधी): स्वच्छ भारत अभियानाचे खरे जनक आणि आपल्या रोखठोक ,मार्मिक व रसाळ वाणीने पुराव्यासहित सोदाहरण देत अंधश्रद्धा आणि पाखंडीपणावर घणाघाती प्रखर हल्ला चढविणारे विज्ञानवादी महान राष्ट्रसंत गाडगेबाबा आणि आपल्या अमोघ अमृत वाणीने संपूर्ण जगाला शांती आणि अहिंसेचा महान संदेश देणारे , मानव आणि प्राण्यांवरही निरतिशय प्रेम करून त्यांची सेवासुश्रुषा करून मानवधर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म असल्याचे सत्य प्रतिपादन करणारे परमकृपाळू महान संत स्वामी शांतीप्रकाशजी महाराज ह्यांना भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करावे तसेच आपल्या जहाल व मार्मिक लेखणीने संबंध भारतातील बहुजन समाजात अन्याय अत्याचाराविरुद्ध लढण्याचे बळ देणारे , विषमतावादी विचारसरणीवर त्वेषाने तुटून पडणारे महान महाकवी वामनदादा कर्डक आणि आपल्या निसर्गदत्त गोड गळ्याने अवघ्या जगाला भुरळ घालणारे आपल्या आभाळाला भिडणाऱ्या पहाडी आवाजाने मुडदयांना सुद्धा लढण्याची प्रेरणा देणारा भारताचा बुलंद आवाज ,आंतरराष्ट्रीय ख्यातीचे महान महागायक प्रल्हाददादा शिंदे ह्या दोन्ही महान कलावंतांना  महाराष्ट्र राज्याच्या महाराष्ट्र भूषण ह्या सर्वोच्च नागरी पुरस्काराने सन्मानित करण्यात यावे अशी जाहीर मागणी भिम आर्मीचे महाराष्ट्र राज्य प्रचार-प्रसिद्धी प्रमुख भिमपँथर मा.राजेश गवळी , उल्हासनगर व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मा.जगदीशभाई तेजवाणी आणि भिम आर्मीचे उल्हासनगर शहरप्रमुख मा.कुमारभाई पंजवाणी यांनी एका संयुक्त  पत्रकाद्वारे केली आहे.

गाडगेबाबा, स्वामी शांतीप्रकाशजी महाराज ह्या महापुरुषांना भारतरत्न तसेच वामनदादा कर्डक आणि प्रल्हाददादा शिंदे ह्या महान कलावंतांना महाराष्ट्र भूषण हे सर्वोच्च पुरस्कार दिल्याने त्यांचा गौरव होणार नसून हा त्या पुरस्कारांचाच सन्मान असेल म्हणून येत्या २६ जानेवारी २०२१ पर्यंत त्यांना हे पुरस्कार जाहीर करण्यात यावे असेही भिमपँथर मा.राजेश गवळी , मा.जगदीशभाई तेजवाणी आणि मा.कुमारभाई पंजवाणी यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट