
शहापुर च्या पत्रकारांचे तहसीलदार विरोधात का होत आहे उपोषण.कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे
- by Adarsh Maharashtra
- Aug 20, 2020
- 1133 views
शहापुर (महेश धानके)जो पर्यंत नीलिमा सूर्यवंशी यांची बदली होत नाही किंवा त्यांची चौकशी होत नाही तो पर्यंत साखळी उपोषण चालू ठेवण्याचा निर्धार पत्रकारांनी केला आहे.
शहापुर च्या तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी यांचा हेकेखोर स्वभाव,कोरोना आटोक्यात आणण्यात आलेले अपयश,हम करे सो कायदा आणि सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात व्यक्त होणाऱ्या लोकांना धमक्या देणे या विरोधात शहापुर तालुक्यातील पत्रकारांनी स्वातंत्र्य दिनापासून साखळी उपोषण सुरू केले आहे.खरेतर तहसीलदार यांची बदली करण्यासाठी पत्रकारांनी उपोषण का करावे याबाबत शहापुर तालुक्यात वेगवेगळे मत आहे,हे पत्रकारांचे काम नाही असेही काही लोक म्हणत आहेत,पत्रकारांच्या खांद्यावर हे उपोषणाचे ओझे कुणी ठेवले आहे अशीही टीका होत असली तरी नीलिमा सूर्यवंशी यांची बदली झाली पाहिजे हे मात्र सर्वच मान्य करत आहेत.
आज पत्रकारांच्या उपोषणाला 6 दिवस होऊन गेले,सर्वच राजकीय पक्ष,सामाजिक कार्यकर्ते यांनी लेखी पाठिंबा दिला,आमदार दौलत दरोडा, माजी आमदार पांडुरंग बरोरा या दोघांनी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे,राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा अध्यक्ष दशरथ तिवरे,शिवसेनेचे जिल्हा प्रमुख प्रकाश पाटील यांनी उपोषण कर्त्यांची भेट घेतली पाठिंबा दिला आणि शेवटपर्यंत सोबत असल्याचे सांगितले, पण त्याने काय साध्य होणार ? ज्यांनी शब्द द्यावा आणि बदली व्हावी ते उपोषणाला पाठिंबा देऊन आपले कर्तव्य संपले असे समजत आहेत,आमदार दौलत दरोडा यांनीही तहसीलदार नीलिमा सुर्यवंशी यांच्या निष्क्रियतेचा पाढा जाहीरपणे वाचून शासनदरबारी त्यांच्या बदलीची लेखी मागणी केली आहे,मात्र त्यांची डाळ काही अजून शिजली नाही,त्यामुळे लेखणी बाजूला ठेवून पत्रकार उपोषणाला बसले आहेत,
उपोषण कर्त्या पत्रकारांच्या बाबतीत काही आक्षेप नोंदवले गेले आहेत,काहींच्या मते हे काम पत्रकारांचे नाही,त्यांनी लेखणी चालवावी,एक अर्थाने हे खरे जरी असले तरी महसुलाच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकरी आणि आता विद्यार्थी यांची ससेहोलपट कशी होत आहे याकडे कुणी पहायचे?एखादया जिल्ह्यात जितके कोरोना रुग्ण नाहीत त्या पेक्षा जास्त शहापुर मध्ये कोरोना रुग्ण आहेत याला जबाबदार कोण?कोविड सेंटर मध्ये उपचार नको पण घाणीचे साम्राज्य हटवा असे म्हणण्याची वेळ का आली आहे?याची उत्तरे कोण देणार?हतबल जनता आणि पुढारी लाचार झाल्यावर दाद कुणाकडे मागायची.कदाचित हाच मुद्दा घेऊन पत्रकार मैदानात उतरले आहेत,शिवाय हे सर्वच पत्रकार भूमिपुत्र आहेत, त्यामुळे हा लढा जनतेसाठी लढला जातोय असे म्हणायला हरकत नाही
पण 5 दिवस होऊनही यावर तोडगा निघत नाही ही काही चांगली लक्षणे नाहीत,शासन प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून काम करणार असेल तर पत्रकारांची लेखणी ही शस्त्र होणारच ना?जिल्हाधिकारी ठाणे,पालकमंत्री यांनी आता पत्रकारांचा अधिक अंत न पाहता याबाबत सकारात्मक भूमिका घ्यावी ही आम जनतेची मागणी आहे आणि ती रास्त आहे
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम