भांडुपमधील गोरगरीब जनतेला रेशन किटचे मोफत वाटप

मुलुंड :(शेखर भोसलेस्वातंत्र दिनाच्या निमित्ताने रिपरिवर्तन फाउंडेशन आणि रिलायंस फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने भांडुपमधील गोरगरीब व गरजू अशा ५०० नागरिकांना रेशन किट वाटप करण्यात आले. निस्वार्थ भावनेने काम केलं कि आपल्यासाठी मदतीचे हजारो हात उभे राहतात, त्याच उक्तीप्रमाणे अनेक जणांनी या कार्यक्रमासाठी हातभार लावला. 


रामकली शाळेचे चेअरमन पप्पी शेठ यांनी त्यांच्या शाळेच्या संकुलातील जागा संस्थेला विनामूल्य उपलब्ध करून दिली. भांडुप विधानसभा आमदार रमेश कोरगावकर यांचे मार्गदर्शन यावेळी लाभले. त्याचप्रमाणे जनता दल सेक्युलर ईशान्य मुंबई अध्यक्ष संजीव कुमार सदानंदन यांनी सुद्धा कार्यक्रमास भेट देऊन उपस्थित सभासदांचे मनोबल वाढविले. शिवसेना शाखा क्रमांक ११४ चे शाखाप्रमुख राजेश कदम आणि जनता दलचे प्रवीण कॅस्ट्रो यांचे नियोजन आणि व्यवस्थापनासाठी उत्तम सहकार्य लाभले. भारतीय जनता पक्षाचे भांडुप विधानसभा अध्यक्ष प्रवीण दहितुले यांनी देखील गर्दीचे नियोजन करण्यासाठी सहकार्य केले. याप्रसंगी संस्थेच्या अध्यक्षा वैशाली बोन्स, उपाध्यक्ष सुशीलकुमार सावळे, सेक्रेटरी रेणू श्रीमांकर, रामकाली शाळेच्या प्रिन्सिपल कुसुम बिश्त, डॉ. आनंदी सिंग, कमलाकर सावळे तसेच नितीन अंभोरे, विशाल खवळे, निलेश अहिरे, अभिषेक साखरे, प्रवीण काकडे, निलेश ढेकळे, संदेश गायकवाड, योगेश ढेकळे, राकेश खोपकर, कुणाल शिंदे, बाळा खरात, सचिन अहिरे, दीपक पाटील, अनिकेत सकपाळ, दानिश शाह, दीपक कांबळे, सिद्धांत माने तसेच महिलामंडळाच्या वतीने ज्योती सावळे, संध्या इंगळे , सखुबाई सुरवाडे, रेश्मा सरोज, उर्मिला जैस्वाल इत्यादी सर्व सभासदाचे उत्तम सहकार्य लाभले. 

रिपरिवर्तन फाउंडेशन गेल्या कित्येक वर्षांपासून समाजसेवेचा वसा जपत आरोग्यसेवा, शिक्षण, आदिवासी विकास, अनाथ मुले, फुटपाथवर राहणारे लोक, वेश्या व्यवसाय करणाऱ्या स्त्रिया, हातमजूर, महिला अत्याचार, सामाजिक सलोखा अशा अनेक क्षेत्रात गेल्या पाच वर्षांपासून अविरत कार्य करत आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट