
भांडुपच्या महिलेचा विक्रोळीतील गोदरेज हास्पिटलमधील डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे मृत्यू...
- by Adarsh Maharashtra
- Aug 09, 2020
- 1188 views
मुलुंड :(शेखर भोसले) विक्रोळीतील गोदरेज हास्पिटलमधील डॉक्टरांनी पहिल्या वेळेत केलेल्या चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे पुन्हा दुसऱयांदा शस्त्रक्रिया करावी लागल्यामुळे भांडुप मधील एका महिलेला आज प्राण गमवावे लागले असून
हास्पिटलच्या या हलगर्जीपणाबद्दल मृत महिलेच्या नातेवाईकांनी गोदरेज हॉस्पिटलच्या प्रशासनाविरोधात व तेथील डॉक्टरांच्या निष्क्रियतेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
भांडुपच्या शोभा कदम नामक महिलेला विक्रोळीच्या गोदरेज हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल करण्यात आले होते. एक सर्जरी झाल्यानंतर दुसरी अजून सर्जरी करणार असल्याचे डॉक्टरांनी महिलेच्या कुटुंबाला सांगितले. परंतु, दुसरी सर्जरी यशस्वी झाली नाही, आणि महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला हॉस्पिटलने ठरवलेल्या पॅकेज प्रमाणे नातेवाईकांनी बिल पेमेंट केल्यावरही परत कराव्या लागलेल्या शस्त्रक्रियेचे लावलेले अतिरिक्त बिल पेमेंट केल्याशिवाय महिलेचे पार्थिव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यास रुग्णालयाने मनाई केली. मृतदेह अडकवून ठेवल्याने संतप्त झालेल्या नातेवाईकांनी विक्रोळीचे आमदार सुनिल
राऊत यांच्याकडे तक्रार केली. आमदार सुनील राऊत ह्यांनी आज सकाळी गोदरेज हॉस्पिटलला धाड टाकून तेथील प्रशासनाला धारेवर धरले आणि मृतदेह तसेच हॉस्पिटल प्रशासनाने त्या मृत महिलेच्या नातेवाईकां कडून घेतलेले चेक सुद्धा त्या कुटुंबाला परत करायला सांगितले. ताबडतोब गोदरेज रुग्णालयाच्या प्रशासनाने त्या महिलेचे पार्थिव कुटुंबाला सुपूर्द केले.
कोरोनाच्या काळात डॉक्टर्स व वैद्यकीय कर्मचारी अतिशय मेहनत घेत आहेत. स्वतःच्या जीवाची काळजी न करता कित्येक कोरोनाबाधित रुग्नांना बरे केले त्यामुळे आम्ही डॉक्टरांना देव मानतो, पण जर अशी मोगलाई आपल्या विधानसभेतील कोणत्याही हॉस्पिटलमध्ये होत असेल तर त्याला शिवसेना स्टाईलने आम्ही उत्तर देऊ असं आमदार सुनील राऊत ह्यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी प्रभाग क्र.११८ चे नगरसेवक उपेंद्र सावंत, उपविभाग प्रमुख चंद्रशेखर जाधव, म.उपविभाग संघटक रश्मीताई पहुडकर, शाखाप्रमुख अभय राणे, राजेश सोनावळे, सचिन मदने, इंद्रजीत गवस आणि अन्य पदाधिकारीही उपस्थित होते.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम