
जिग्नेश ठक्कर हत्ये प्रकरणी,आणखीन एकास अटक
- by Adarsh Maharashtra
- Aug 09, 2020
- 990 views
डोंबिवली :(श्रीराम कांदू) कल्याण-स्टेशन परिसरातील निलम गल्लीत जिग्नेश ठक्कर याची गोळ्य़ा घालून हत्या करण्यात आली होती. या हत्ये प्रकरणी शार्प शूटरला दोन दिवसापूर्वी ठाणो खंडणी विरोधी पथकाने गुजरात येथून अटक केली होती. त्यानंतर दोन जणांना काल करण्यात आली होती. आज आणखीन एकाला अटक करण्यात आली असून त्याचे नाव चेतन पटेल असे आहे.
29 जुलै रोजी चेतन पटेल याच्यासोबत जिग्नेशचे भांडण झाले होते. या प्रकरणी चेतन ने जिग्नेश्चया विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. जिग्नेश यानेही पटेलच्या विरोधात तक्रार दिली होती. दोघांच्या विरोधात बाजारपेठ पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या घटनेचा राग नन्नू शहाला होता. नन्नू व जिग्नेश हे बालपणापासून मित्र होते. एका खंडणी प्रकरणी ते जिग्नेश व नन्नू शहा हे सह आरोपी होते. नन्नू शहाच्या विरोधात 15 ते 20 गुन्हे दाखल आहेत. खंडणी, हत्येचा प्रयत्न, हत्या या सारखे गुन्हे दाखल आहेत. जिग्नेशच्या विरोधातही गंभीर स्वरुपाचे पाच गुन्हे दाखल होते. जिग्नेशच्या हत्ये प्रकरणी ठाणो खंडणी विरोधी पथकाने जयपानला अटक केली आहे. त्यानंतर पोलिसांनी अमजद पठाण व मुन्ना शहाला अटक केली आहे. या तिघांच्या
अटकेपश्चात आच चेतन पटेलला अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात आत्तार्पयत चार आरोपी अटक करण्यात आलेले असले तरी प्रमुख आरोपी नन्नू शहाला अद्याप अटक झालेली नाही. पोलिस त्याच्या शोधात आहेत. जिग्नेशची हत्या ही खंडणी प्रकरणातील आर्थिक वादातून झाली असण्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी हत्येच्या दुस:या दिवशीच व्यक्त केला होता. खंडणी प्रकरणातील आर्थिक व्यवहार बिनसला होता. तसेच जिग्नेशहा कल्याण स्टेशन परिसरात घोडी दाणा जुगार व मटक्याचा धंदा चालवायचा.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम