
बकरी ईद निमित्त कुर्बानी देण्यात अडथळे मुस्लिम धर्मियांचा आंदोलनाचा इशारा
- by Adarsh Maharashtra
- Jul 30, 2020
- 884 views
मुंबई, ३० जुलै :मुस्लिम धर्मियांकडून बकरी ईद हा सण १ ऑगस्ट रोजी साजरी होत आहे. या निमित्ताने बकऱ्यांची कुर्बानी देण्याची प्रथा आहे. मात्र, करोनामुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता यंदा बकरी ईद साध्या पद्धतीने साजरी करण्याच्या सूचना राज्य शासनाच्या वतीने करण्यात आल्या आहेत. याच वेळी महापालिकांनी काही नियमावली जाहीर केली आहे.
संसर्गजन्य परिस्थितीमुळे सर्व धार्मिक कार्यक्रमांना बंदी आहे. त्यानुसार बकरी ईदची नमाज मस्जिद वा अथवा सार्वजनिक ठिकाणी साजरी न करता घरीच नमाज अदा करावी, जनावरांचे बाजार बंद राहतील. नागरिकांना जनावरे खरेदी करावयाची झाल्यास ऑनलाइन पद्धतीने वा दूरध्वनी वरून जनावरे खरेदी करावीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
याशिवाय नागरिकांनी प्रतिकात्मक कुर्बानीवर भर द्यावा. पालिका हद्दीतील प्रतिबंधित क्षेत्रांत सध्या लागू असलेले निर्बंध कायम राहणार आहेत. त्यात कोणतीही शिथिलता आणली जाणार नाही, असे नमूद करण्यात आले आहे.दुसरीकडे महाविकास अघाडी सरकारने आमचा अपेक्षा भंग केला आहे. बकरी ईद निमित्त पशूंची कुर्बानी देण्यात सरकार अडथळे आणत आहे. हे थांबले नाही, तर आम्ही आंदोलन करू, असा इशारा मुंबईतील मुस्लिम कार्यकर्ते आणि काही मौलानांनी दिला आहे. हांडीवाली मशिदीचे इमाम मौलाना ऐजाज कश्मीर यांनी म्हटले आहे, की पोलिसांनी जेथे वाहने अडवली, तेथे त्यांचे मुस्लीम सहकारी गेले देखील, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. माजी मंत्री नसीम खान म्हणाले, इस्लाममध्ये प्रतीकात्मक कुर्बानीची संकल्पना नाही. ऑनलाइन बकरे विकत घेण्यातही अडचणी येत आहेत.उद्धव ठाकरे यांच्या सरकारवर मौलानांनी निशाणा साधला आहे.
सरकारने बकरी ईद निमित्त कुर्बानी देणे अवघड केले आहे. एवढेच नाही, तर बकऱ्यांची ऑनलाईन खरेदी विक्री करण्यातही अडचणी आणल्या जात आहेत. बकरे घेऊन येणारी वाहने अडवली जात आहेत,” असे मौलानांनी म्हटले आहे.की दुसऱ्या राज्यांतून बकरे घेऊन येणारी वाहने सीमेवर अडवले जात आहेत. त्यांना चेक पोस्टवरून आत येण्यापासून रोखले जात आहे. पोलीस एका वेळी केवळ दोनच बकरे नेण्यास परवानगी देत आहेत.यामुळे संबंधित लोकांना नाहक त्रास होत आहेत.तसेच देवनारच्या कत्तलखान्यात रोज म्हशी कापल्या जातात. पण कुर्बानीसाठी म्हशी कापण्यास परवानगी नाही. हा कुठला नियम आहे, असा सवाल अमन कमिटीचे प्रमुख फरीद शेख यांनी केला. ‘यापूर्वीचे फडणवीस सरकार प्रत्येक सणापूर्वी मुस्लिम एनजीओ, मौलाना आणि आमदारांची बैठक घ्यायचे. ठाकरे सरकारने, अशी कुठलीही बैठक घेतलेली नाही,’ असेही शेख म्हणाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम