महाराष्ट्र सायबर विभाग लॉकडाऊनच्या काळात ५६४ गुन्हे दाखल २९० लोकांना अटक नाशिक ग्रामीण येथे नवीन गुन्हा

मुंबई : लॉकडाऊनच्या काळात राज्यामध्ये काही गुन्हेगार व समाजकंटक  गैरफायदा घेण्याचा प्रयत्न करत आहेत . त्यांच्याविरुद्ध महाराष्ट्र सायबर विभागाने  कठोर पाऊले उचलली आहेत.  राज्यात सायबर संदर्भात ५६४  गुन्हे दाखल झाले असून २९० व्यक्तींना अटक केली आहे.अशी माहिती महाराष्ट्र सायबर विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक यांनी दिली आहे. 

महाराष्ट्र राज्यातील विविध पोलीस स्टेशन मध्ये एकूण ५६४  गुन्ह्यांची (ज्यापैकी ५१ N.C आहेत) नोंद २६ जुलै २०२० पर्यंत झाली आहे.

या सर्व गुन्ह्यांचे महाराष्ट्र सायबरने जेव्हा विश्लेषण केले तेव्हा असे निदर्शनास आले की आक्षेपार्ह व्हाट्सअँप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी २११ गुन्हे दाखल झाले आहेत,तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी  २३९    गुन्हे दाखल करण्यात आले आहेत ,tiktok विडिओ शेअर प्रकरणी २८ गुन्हे दाखल झाले आहेत व ट्विटर द्वारे आक्षेपार्ह ट्विट केल्या प्रकरणी १८ गुन्हे दाखल झाले आहेत, इंस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्याप्रकरणी ५ गुन्हे दाखल झाले आहेत .तर अन्य सोशल मीडियाचा ( ऑडिओ क्लिप्स, youtube) गैरवापर केल्या प्रकरणी ६३  गुन्हे दाखल झाले आहेत व त्यामध्ये आतापर्यंत  २९०  आरोपींना अटक केली आहे . तर यापैकी ११८ आक्षेपार्ह पोस्ट्स takedown करण्यात यश आले आहे .

नाशिक ग्रामीण पोलीस जिल्ह्यातील जायखेडा  पोलीस स्टेशनमध्ये एका गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे त्यामुळे या विभागातील गुन्ह्यांची संख्या २१  वर गेली आहे . सदर गुन्ह्यातील आरोपीने कोरोना महामारीच्या काळात ,

आपल्या व्हाट्सअँपद्वारे कोरोना महामारी बद्दल व त्यावरील उपचारांबद्दल चुकीची माहिती   नमूद करणाऱ्या आशयाचा मजकूर असणारी पोस्ट  विविध व्हाट्सअँप ग्रुप्सवर प्रसारित केली होती ,त्यामुळे लोकांमध्ये गोंधळ निर्माण होऊन  परिसरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ शकला असता.

सध्या कोरोना महामारीच्या काळात व्हाट्सअँपवर तसेच अन्य सोशल मिडियावर कोरोनाग्रस्त रुग्णांची नाव व अन्य माहिती प्रसारित होत आहे . महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना अशी विनंती करते कि कृपया तुम्हाला अशा आशयाच्या  काही पोस्ट्स आल्या तर आपण त्या पोस्ट्स पुढे पाठवू नये .रुग्णांची माहिती अशा प्रकारे जर कोणी तुम्हाला फॉरवर्ड करत असतील तर तुम्ही त्या व्यक्तीस तसे करण्यापासून परावृत्त  करा ,जर कोणी अशी माहिती पाठवत असेल आणि  तुम्ही व्हाट्सअँप ऍडमिन किंवा निर्माते (group creator ) असाल  तर तात्काळ सदर ग्रुप सदस्याची त्या ग्रुपवरून हकालपट्टी करावी आणि ग्रुप सेटिंग 'only admin ' असे करावे . कोरोनाग्रस्त रुग्णांची माहिती अशा प्रकारे प्रसिद्ध करणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि त्यामुळे तसे मेसेज, विडिओ ,किंवा पोस्ट्स टाकणाऱ्या व्यक्तींवर व संबंधित व्हाट्सअँप ग्रुपच्या  ऍडमिन्सवर कायदेशीर कारवाई   होऊ शकते. अशी माहिती विशेष पोलीस महानिरीक्षक, महाराष्ट्र सायबर, मुंबई यांच्या वतीने देण्यात आली आहे.


रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट