सुशांतसिंग राजपूत आत्महत्या प्रकरणी करण जोहर,कंगना रानौत ,दिग्दशृक महेश भट्ट यांचीही याच आठवड्यात होणार चौकशी

मुंबई,२७ जुलै:सुशांतसिंग राजपूतने गेल्या १४ जूनला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी मुंबई पोलीस तपास करत आहेत. आत्तापर्यंत मुंबई पोलिसांनी ३७ जणांची चौकशी करत त्यांचा जबाब नोंदवला आहे. आता कंगना रानौत , दिग्दशृक महेश भट्ट यांनाही आपला जबाब नोंदवण्यासाठी समन्स पाठवण्यात आला आहे. तर करण जोहरच्या मॅनेजरलाही कॉल करण्यात आला आहे. गरज पडली तर करण जोहरलाही कॉल केला जाईल, असे अनिल देशमुख यांनी सांगितले होते.त्यानुसार आज चित्रपट निर्माते महेश भट्ट यांची सुशांतसिंग राजपूत मृत्यू प्रकरणात मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली.

दरम्यान अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमध्ये असलेल्या घरणेशाहीवरून वाद चांगलाचं पेटताना दिसत आहे. मुख्य म्हणजे या वादाच्या भोवऱ्यात अभिनेत्री कंगना रानौतने आता राज्याचे पर्यावरण मंत्री व शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांना देखील ओढले आहे.

दिग्दर्शक करण जोहर आणि आदित्य ठाकरे एकमेकांचे चांगले मित्र असल्यामुळे अद्याप करणची चौकशी झाली नसल्याचा आरोप कंगनाने केला आहे.मात्र चित्रपट निर्माता करण जोहर याची देखील याच आठवड्यात चौकशी होणार आसल्याची माहिती समोर आली आहे. समाज माध्यमांवर देखील करण जोहर मोठ्या प्रमाणावर नेटीझनच्या टीकेचा धनी झाला असून, सुशांत सिंग राजपूत आत्महत्येनंतर करण जोहर नेटिझन्सच्या सतत रडारवर आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट