
राममंदिरावरील जनतेचे लक्ष विचलित करण्याचा प्रयत्न,भाजपा सरचिटणीस आ. रवींद्र चव्हाण यांचा टोला
- by Adarsh Maharashtra
- Jul 22, 2020
- 1422 views
डोंबिवली( श्रीराम खंडू) राममंदिर भूमी पूजनावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टोला दिल्यानंतर त्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. तर शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही याच मुद्द्यावर टिका केल्याच्या पार्श्वभूमीवर डोंबिवलीचे आमदार तथा भाजपा सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी राम मंदिरावरील जनतेचे जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी महाविकास आघाडीतील नेत्यांकडून अशी विधाने केली जात असल्याचा टोला मारून खळबळ उडवून दिली आहे.
उत्तर प्रदेशातील अयोध्येमध्ये राममंदिराचे काम ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सुरु होणार आहे. राममंदिराचे भूमिपूजन 5 ऑगस्टला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पार पडणार आहे. या भूमीपूजनाच्या कार्यक्रमावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाष्य केल्याचे पडसाद सर्वत्र उमटले आहेत. त्यापाठोपाठ मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अयोध्येत जाण्यासाठी कुणाच्या निमंत्रणाची गरज नाही, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकार आणि भाजपचे नाव न घेता टीका केली. राऊत यांच्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे अयोध्येत जाणार असल्याचे संकेत मिळत असतानाच डोंबिवलीचे आमदार तथा भाजपा सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांनी कोणत्याही नेत्याचे नाव न घेता टिका केली आहे. आमदार रवींद्र चव्हाण म्हणाले, भाजप आणि एनडीएच्या अजेंड्यावर रामंदिराचा विषय गेल्या अनेक वर्षांपासून आहे आणि आज तो पूर्णत्वाच्या दिशेने जातो हे लक्षात आल्यावर काही पक्षांचे नेते जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी वेगवेगळी विधाने करत आहेत. कोरोनाच्या काळामध्ये राज्यातील जनतेला शासनाच्या माध्यमातून आरोग्य व्यवस्था उपलब्ध करून देण्यात असफल ठरल्यामुळे महाविकास आघाडीतील शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेसची मंडळी राममंदिरच्या मुद्द्यावर विधाने करत सुटली आहेत हा त्यांचा खोडसळ प्रयत्न असल्याचा आरोप आमदार चव्हाण यांनी केला आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम