
एमएसआरडीसीने फोडले कंत्राटदारावर खापर पत्रीपूल उखडल्याने कामातील अनियमितता उघड
- by Adarsh Maharashtra
- Jul 17, 2020
- 863 views
डोंबिवली (श्रीराम खंडू) कल्याण-शिळ महामार्गावर रस्त्याच्या रुंदीकरण आणि सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू आहे. बहुतांश ठिकाणी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. त्यातच एकीकडे कल्याणच्या पत्रिपुलावरील रस्ता उखडल्याने तेथील कामातील अनियमितता उघड झाली आहे. मात्र दुसरीकडे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास प्राधिकरण अर्थात एमएसआरडीसीने कंत्राटदारावर खापर फोडले आहे.
पत्रिपुलावरील वाहनांसाठी काही ठिकाणी सिंगल लेन रस्ता उपलब्ध आहे. परंतु सद्या रस्त्याची परिस्थिती पाहिली तर जागोजागी मोठ-मोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहनचालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. त्यात पावसाळा सुरू असल्याने प्रवाशांच्या अडचणीत अधिकच भर पडत असून, अपघातही वाढले असल्याने पुन्हा एकदा खड्याचे बळी जाऊ नयेत यासाठी तातडीने या महामार्गावरील खड्डे बुजवावेत, याकडे मागणी कल्याण ग्रामीणचे आमदार प्रमोद तथा राजू पाटील यांनी एमएसआरडीसीच्या कार्यकारी अभियंत्यांचे एका पत्राद्वारे लक्ष वेधले आहे. कल्याण-शीळ रस्ता हा ठाणे, नवी मुंबई कल्याण, डोंबिवली, भिवंडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर शहर आणि ग्रामीण भागाला जोडणारा महत्वाचा दुवा मानला जातो. दररोज रात्रंदिवस हजारो वाहने या रस्त्यावरून जात-येत असतात. सद्या लॉकडाऊनमुळे सर्वसामान्य प्रवाशांसाठी रेल्वे सेवा बंद आहे. त्यामुळे अशावेळी वरील सर्व परिससरात राहणाऱ्या नागरिकांना कल्याण-शिळ रस्त्यावरून वाहनाने प्रवास करण्याशिवाय अन्य कोणताही पर्याय उपलब्ध नाही. तरी त्या रस्त्याची परिस्थिती पाहता, या रस्त्यावरील खड्डे ताबडतोब बुजविण्याचे काम हाती घ्यावे, तसेच केलेल्या कार्यवाहीची तातडीने लेखी माहिती उपलब्ध करून द्यावी, असेही आ. पाटील यांनी त्यांच्या पत्रात म्हटले आहे.
एमएसआरडीसी सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार सद्या या रस्त्याचे सिमेंट काँक्रीटीकरण काम सुरू आहे. पावसामुळे ते संथगतीने पुढे सरकत आहे. 21 मीटर लांबीच्या स्त्यामध्ये एकूण 8 लाईन्स पैकी 2 लाईन्सचे सुमारे 18 किमीपर्यंत काँक्रीट काम झाले आहे. बाकी लाईन्सचे काम येत्या काही दिवसांत हाती घेण्यात येणार आहे. तसेच लॉकडाऊनमुळे चार महिने मजुरांच्या उपलब्धतेची समस्या होती. ही समस्या मार्गी लागून लवकरच या रस्त्यावरील प्रलंबित कामांना वेग दिला जाईल, असे एमएसआरडीसीचे म्हणणे आहे. पत्री पूल दरम्यान असलेले खड्डे चिखल-खडीने बुजवण्यात आले. मात्र या कामाबद्दल आमदार ग्रामीणचे आमदार प्रमोद तथा राजू पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. ही थुकपट्टीची कामे असून योग्य नसल्याचा आरोप त्यांनी केला.अभियंत्यावर कोणाचाही वचक राहिलेला नाही, सब घोडे 12 टके अशी टीकाही आमदार पाटील यांनी केली.
कंत्राटदारावर फोडले खापर कल्याणच्या नवीन पत्री पुलासाठी बांधकाम साहित्य नेण्याकरिता पुलाच्या कंत्राटदाराने मुरूम मिश्रित खडीने रस्त्यावरील खड्डे बुझवले. त्याच दिवशी रस्त्याच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदाराने मुरुममिश्रित खडी काढून कोल्ड मिक्स व पेव्हर ब्लॉकने खड्डे बुझवल्याची माहिती एमएसआरडीसीचे जनसंपर्क अधिकारी तुषार अहिरे यांनी दिली.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम