
राजभवनावर कोरोनाचा कहर,16 कर्मचारी आढळले पॉझिटिव्ह ;तर राज्यपाल भगतसिंग कोश्यारी झाले क्वारंटाइन
- by Adarsh Maharashtra
- Jul 12, 2020
- 1389 views
मुंबई, 12 जुलै :-महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. सर्वाधिक रुग्ण हे राज्याची राजधानी मुंबईत आढळले आहे.आता राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे निवासस्थान असलेले राज्यभवन कोरोनाच्या विळख्यात सापडलं आहे राजभवनावर 16 जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे.महाराष्ट्राच्या राजभवनावर कोरोनाने कहर केला आहे.
राजभवनावरील 100 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी घेण्यात आली होती. यात आतापर्यंत 55 जणांचे अहवाल हाती आले आहे. यात 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न झालं आहे. 16 जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.यात सर्वात आधी एक वायरमॅन कोरोनाचा पॉझिटिव्ह आढळून आला होता.त्याची सर्वात आधी चाचणी करण्यात आली होती. अद्याप 45 लोकांचे कोरोनाचे रिपोर्ट येणे बाकी आहे.तर दुसरीकडे राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची प्रकृती उत्तम आहे. त्यांना कोरोनाची लागण झाला नाही. खबरदारी म्हणून राज्यपाल स्वत: क्वारंटाउन राहत आहे.
अमिताभ बच्चन अभिषेक बच्चन यांनाही कोरोनाची लागण
दरम्यान, मुंबईत बॉलिवूड मध्येही कोरोनाने शिरकाव केला आहे. महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यापाठोपाठ त्यांचा मुलगा अमिताभ बच्चन याचाही रिपोर्ट कोरोना पॉझिटिव्ह आला आहे.अमिताभ यांनी स्वतःच त्यांना कोरोनाची लागण झाल्याची बातमी Tweet करून दिली. आता मुलगा अभिषेकसुद्धा पॉझिटिव्ह आला आहे. अमिताभ यांच्या जलसा आणि जनक या बंगल्यात राहणाऱ्या सर्वांची आता COVID चाचणी होणार आहे. मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं आहे. अमिताभ यांच्या चाहत्यांनी रुग्णालयाबाहेर गर्दी करू नये यासाठी नानावटी हॉस्पिटलबाहेर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
अमिताभ आणि अभिषेक या दोघांचीही प्रकृती स्थिर आहे. त्यांना कोरोनाची सुरुवातीची लक्षणं दिसत होती अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यांच्या आणखी काही चाचण्या करण्यात येणार असल्याचंही डॉक्टरांनी सांगितलं आहे.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम