
BREAKING महाराष्ट्रात३१ जुलैपर्यंत Lockdown वाढला, राज्य सरकारचा मोठा निर्णय
- by Adarsh Maharashtra
- Jun 29, 2020
- 1161 views
मुंबई (प्रतिनिधी) : महाराष्ट्रत लॉकडाऊन ३१ जुलैपर्यंत वाढविण्यात आला आहे. सध्या जे नियम आहेत त्यात फारसा बदल करण्यात आलेला नाही. कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने हा मोठा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारच्या संवादात याचे संकेत दिले होते.
कोरोना रुग्णांची वाढती संख्या काही थांबवण्याचं नाव घेत नाही आहे. दर दिवशी कोरोनाची रेकॉर्ड ब्रेक आकडेवारी समोर येत आहे. देशात कोरोनाची एकूण संख्या ५ लाख ४८ हजार ३१८ वर पोहोचली आहे. गेल्या २४ तासांत कोरोनाचे १९,४५९ नवीन रुग्ण आढळले आणि ३८० जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे. सलग दुसर्या दिवशी कोरोनाची जवळपास २० हजार प्रकरणं समोर आली आहेत.
आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, देशात कोरोनाचे २ लाख १० हजार १२० अक्टिव्ह रुग्ण आढळले आहेत. कोरोनामधून आतापर्यंत १६ हजार ४७५ रूग्णांनी आपला जीव गमावला आहे. तर ३ लाख २१ हजार ७२२ रूग्ण बरे झाले आहेत ही दिलासादायक बाब
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम