
मुलुंड कॉलनी परिसरात दहशत माजविणार्या लांबाला अटक
- by Adarsh Maharashtra
- Jun 28, 2020
- 1511 views
मुलुंड :(शेखर चंद्रकांत भोसले) मुलुंड कॉलनी परिसरात दहशत माजविणार्या बलबीर सिंग लांबा उर्फ गिनी याला मुलुंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून मुलुंड कॉलनी परिसरातील आर्य समाज हॉल समोर असलेल्या समाज कल्याण केंद्रात बस्तान मांडण्यासाठी तो परिसरात दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता असा त्याच्यावर आरोप ठेवण्यात आला आहे.
मुलुंड कॉलनी परिसरातील आर्य समाज हॉल समोर बांधण्यात आलेल्या समाज कल्याण केंद्राची जागा हडप करण्यासाठी बलबीर सिंग लांबा उर्फ गिनी याने गेल्या काही दिवसांपासून या समाज कल्याण केंद्रात येणाऱ्या स्थानिक नागरिकांना त्रास द्यायला सुरुवात केली होती. त्यामुळे अनेक नागरिकांनी यासंबंधीच्या तक्रारी मुलुंड पोलिस ठाण्यात या आधीही दाखल केल्या होत्या.
गेल्या आठवड्यापासून गिनी त्याच्या काही साथीदारांसह या समाज कल्याण केंद्रात कामाशिवाय येवून बसायला लागल्याने, कामाशिवाय समाज कल्याण केंद्रात बसू नको असे काही नागरिकांनी त्याला सांगितले परंतु ते न ऐकता तेथील स्थानिक नागरिकांसोबत त्याने वाद घालायला सुरुवात केली. त्यामुळे त्रासलेल्या स्थानिक रहिवाशांनी मुलुंड पोलिस ठाण्यात काही दिवसांपूर्वी तक्रार दाखल केली. याची खबर मिळताच गिनी याने समाज कल्याण केंद्रात जावून तेथे उपस्थित असलेल्या एका रहिवाशाला लोखंडी रॉडने मारण्याचा प्रयत्न केला. यात हा रहिवासी किरकोळ जखमी झाला. तसेच या मारहाणीनंतर त्याने परिसरातील काही वाहनांना टार्गेट करुन काही गाड्यांच्या काचा फोडल्या व तेथून पळ काढला.
अखेर पोलिसांनी कायदा हातात घेणाऱ्या गिनीला पकडून ताब्यात घेतले असता त्याने यासर्वांनी माझ्यावर चॉपर आणि तलवारीने हल्ला केल्याचे सांगितले परंतु तेथे उपस्थित रहिवाशांनी हा खोटे बोलत असल्याचे सांगितले व त्याने केलेल्या कुकृत्यांचा पाढा पोलिसांसमोर वाचला. अखेरीस पोलिसांनी गिनी याला अटक केले व गुन्हा दाखल केला. या आधीही बलबीर सिंग लांबा उर्फ गिनी याच्यावर मुलुंड पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल असून त्याला मागे तडीपार देखील करण्यात आले होते, असे पोलिस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून समजले
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम