कोरोना'वरून मनसे आक्रमक;औरंगाबादेत अतिरिक्त आयुक्तांच्या डोक्यात खुर्ची घालण्याचा प्रयत्न
- by Adarsh Maharashtra
- Jun 26, 2020
- 1511 views
औरंगाबाद : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे आणि या गोष्टीला महापालिका प्रशासनाने अवलंबलेली पद्धत जबाबदार आहे, असा आरोप करत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने महापालिकेवर हल्लाबोल केला. शिष्टमंडळाची अतिरिक्त आयुक्त रविंद्र निकम यांच्यासोबत चर्चा सुरू असताना झालेल्या शाब्दिक चकमकीनंतर जिल्हाध्यक्ष सुहास दाशरथे यांनी हातात खुर्ची घेऊन ती निकम यांच्या डोक्यात घालण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे दालनात एकच खळबळ उडाली.
कोरोना आजाराशी लढा देताना महापालिका प्रशासन अपयशी ठरल्याचा आरोप मनसेने केला आहे. औरंगाबादकरांना कोरोना च्या खाईत लोटण्याचे काम महापालिकेने केले. महापालिकेने तयार केलेल्या विलगीकरण कक्षांमध्ये प्रचंड सावळागोंधळ आहे. नागरिकांना आंघोळीसाठी गरम पाणी नाही, जेवणाची व्यवस्था नाही, रुग्णालयांमध्ये रुग्ण आणि नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे. कंत्राटी पद्धतीवर घेण्यात आलेल्या डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना मागील तीन महिन्यांपासून महापालिकेने पगार दिलेला नाही. आशा वर्कर आणि लाळेचे नमुने घेणारे डॉक्टर जीव मुठीत धरून काम करीत आहेत. महापालिकेतील कायमस्वरूपी डॉक्टर मुख्यालयात बसून काम करत आहेत. फिल्डवर कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुढे करण्यात येत आहे. या सर्व प्रकारांचा जाब विचारण्यासाठी शुक्रवारी दुपारी मनसेचे शिष्टमंडळ महापालिकेत दाखल झाले.
रिपोर्टर
Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.
आदर्श महाराष्ट्र वेब टीम