कोविड रुग्णांनी घरातच उपचाराला प्राधान्य दिल्याने मुलुंडमधील कोविड रुग्णालयातील बेड होवू लागले रिकामे

मुलुंड : (शेखर चंद्रकांत भोसले) कोरोना  रुग्णांची संख्या मुलुंडमध्ये झपाट्याने वाढायला लागल्याने मुलुंड पूर्व आणि पश्चिम येथील सर्व कोविड उपचार केंद्रात बेडची अनुलब्धता होवू लागल्याने कित्येक रुग्णांना पालिकेच्या उपचार केंद्रातील बेडसाठी तिष्ठत राहावे लागत होते परिणामी काही जण खाजगी रुग्णालयात उपचारासाठी जावू लागले परंतु तेथील खर्च न परवडणारा असल्यांने अनेक कोरोनाबाधित रुग्णांनी घरातच उपचार घेणे चालू केले असून मुलुंडमधील म्हाडा, गव्हाणपाडा, टाटा कॉलनी येथील काही रुग्णांनी घरातच स्वतःला विलगीकरण करुन उपचार सुरू केले असल्याचे समोर आले आहे. पालिकेच्या आरोग्य विभागाने देखील याला दुजोरा दिला असून कोरोना बाधित रुग्णांना उपचार केंद्रात नेण्यासाठी आणि त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पालिका प्रशासनाकडे असलेली यंत्रणा, बेड कमी पडत असल्याचे कबूल केले आहे. 

कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे पालिकेच्या कोरोना उपचार केंद्रात बेडची कमी निर्माण झाली आहे तसेच तेथे व्हेंटिलेटरची कमतरता देखील आहे. रुग्णांना हॉस्पिटलमध्ये घेवून जाण्यासाठी वेळेवर रुग्णवाहिका देखील ऊपलब्ध होत नसल्यामुळे अनेक कोरोनाबाधित रुग्ण सध्या कोविड उपचार केंद्रात दाखल होण्याचे टाळत असून राहत्या घरात विलगीकरणाची पुरेशी व्यवस्था असेल तर पालिकेच्या आरोग्य विभागाला कळवून घरातच उपचार घेत असल्याचे मुलुंड मध्ये मोठ्या प्रमाणात आढळून यायला लागले आहे. पालिका डॉक्टरांच्या व आरोग्य सेविकांच्या सल्ल्याने तसेच फॅमिली डॉक्टरांच्या देखरेखीखाली घरातील इतर सदस्यांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेवून घरातच उपचार करुन घेत आहेत. त्यात अनेक कोविड रुग्ण पूर्णपणे बरे झाले असल्याचे आढळून आले आहे. 

रुग्णालयात भरती न होता अनेक कोविड रुग्णांनी घरातच उपचार घेण्याला प्राधान्य दिले असल्याने पालिकेच्या मिठागर रोड येथील कोविड उपचार केंद्रात सध्या अनेक बेड रिक्त असल्याचे आढळून आले आहे तर फोर्टिस रुग्णालयात देखील काही बेड रिकामे असल्याचे समजले आहे. तसेच मुलुंड पश्चिमेकडील जकात नाक्यावर नव्याने बनलेल्या १२५ बेडचे कोविड उपचार केंद्र बनवून तयार आहे.

रिपोर्टर

  • Adarsh Maharashtra
    Adarsh Maharashtra

    Adarsh Maharashtra is a Digital Media Site. This app is the mobile Version of Adarsh Maharashtra Marathi News Paper. It is 24 hour web news and local news which assure you to show only what is truth, the idea behind Adarsh Maharashtra News to make aware what is happening all over, and to combine advanced news delivery technologies. We are hard working, honest and courages who wants do something for our people and coming generation.

    आदर्श महाराष्ट्र वेब टीम

संबंधित पोस्ट