
समत्व ट्रस्ट ठाणेच्या वतिने अंत्रवली व हेदली गावी जिवनावश्यक वस्तुचे वाटप
ट्रस्टचे अध्यक्ष संतोष कांबळे यांच्या हस्ते ६५ कुटुंबिंयाना केले वाटप
- by Reporter
- Jun 25, 2020
- 589 views
मुंबई (शांत्ताराम गुडेकर ) : अंत्रवली गावचे सुपुत्र समत्व ट्रस्टचे अध्यक्ष हे ट्रस्टच्या माध्यमातुन तालुक्यात वेग वेगळे ऊपक्रम राबवुन सामाजिक बांधिलकी जपत असतात. प्रतिवर्षी गरजु शालेय विद्यार्थ्याना मोफत वस्तुचे वाटप या ट्रस्टच्या माध्यमातुन करत करतात.मुलाना गणवेश , छत्री ,वह्या ,पुस्तके दप्तर आदी बरोबर अगदी काही मुलांची शैक्षणिक फी भरण्याचे कामही ही संस्था करते. सध्या कोरोना सारख्या महामारीने संपुर्ण देश त्रस्त झाला असुन अनेकाना आपल्या नोकर्या गमवाव्या लागल्याने बहुसंख्य चाकरमानी गावी आले आहेत . कामधंदा नसल्याने गावी आल्याने एकवेळ जेवणाची पंचाईत झाली असल्याने अनेकजण चिंतेत आहेत. अशाच अंत्रवली व हेदली गावातील ६५ चाकर मानी कुटुंबाना जिवनावश्यक वस्तुचे वाटप करुन या संस्थेने सामाजिक बांधिलकी जपली आहे. त्यावेळी ट्रस्ट चे अध्यक्ष संतोष कांबळे, नरेंद्र खानविलकर, गणपत दाभोलकर ,रुपेश कांबळे आणि रेश्मा वाझे उपस्थित होते
रिपोर्टर